शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

भाजपकडून ३४ जागांची मागणी, मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आल्याने तडजोड - चंद्रशेखर बावनकुळे

By योगेश पांडे | Published: April 17, 2024 5:15 PM

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.

नागपूर : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपला ३४ जागा मिळाव्या ही पक्षाध्यक्ष म्हणून माझी व कोअर ग्रुपचीदेखील मागणी होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा सन्मान राखणेदेखील महत्त्वाचे होते. महायुतीचे जागावाटप करताना आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलो व त्यामुळेच काही जागांवर तडजोड करावी लागली, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आम्ही महायुतीचे उमेदवार ठरविताना शिवसेना व राष्ट्रवादीला विश्वासात घेतले होते. जिंकणे हेच आमचे ध्येय आहे. कुठलीही रिस्क नको म्हणून तीनही पक्षांनी काही उमेदवार बदलले. यात आमच्याकडून ढवळाढवळ करण्याचा प्रश्न येत नाही. तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून उमेदवार ठरविले. शिंदे १३ खासदार घेऊन महायुतीत आले होते व आता १५ मतदारसंघात त्यांचे उमेदवार उतरले आहेत. आमच्या सर्व सर्वेक्षणाची माहिती दोन्ही पक्षांना दिली होती, असे बावनकुळे यांनी सांगितले.

सर्व पक्षांचे मत घेऊनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आम्हाला सहकार्य करण्याची विनंती केली. विधानसभेत एक-दोन जागांसाठी तडजोड करावी लागली तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या २०० हून अधिक जागा महायुतीच्या निवडून येतील, असा दावा बावनकुळे यांनी केला.

प्रकाश आंबेडकरांना कॉंग्रेसने धोका दिला

बाबासाहेब आंबेडकरांना कॉंग्रेसने मुंबई, भंडाऱ्यात पराभूत केले होते. तर प्रकाश आंबेडकर यांनादेखील कॉंग्रेसने वर येऊ दिले नाही. कॉंग्रेसमुळेच आंबेडकर महाविकास आघाडीत जाऊ शकले नाही. कॉंग्रेसने त्यांना धोका दिला, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर