शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात अखेर सामुदायिक प्रार्थनेला सुरुवात

By admin | Updated: May 12, 2016 02:59 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ‘अतिउच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार ..

राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रसारासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार: दर गुरुवारी राबविणार उपक्रमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये सायंकाळच्या सुमारास अचानक ‘अतिउच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिये हमको सभीसे गर्ज है’ हे सूर घुमू लागले अन् एरवी या वेळेला घरी जाणारी पावले आपसूकच थांबली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेल्या प्रार्थनेतील एकेक ओळ विद्यार्थ्यांना एकत्र आणत होती अन् प्रत्येक उपस्थिताचे हृदय आध्यात्मिक भावनेने ओथंबून गेले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नागपूर विद्यापीठाला नाव असतानादेखील त्यांची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी फारसे प्रयत्न करण्यात येत नव्हते. परंतु तुकडोजी महाराज अध्यासनातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला अन् सर्वधर्मसमभाव, समता, बंधुता आणि राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेचे सूर निनादू लागले. दर गुरुवारी ‘कॅम्पस’मधील ग्रामगीता भवनात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन होणार आहे.नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव दिल्यानंतर विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन निर्माण झाले. महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार आणि साहित्याचे संशोधन व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून ग्रामगीता भवनदेखील साकारले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विषयाचे एम ए चे वर्गही ग्रामगीता भवनात सुरू आहेत. परंतु नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचविणाऱ्या विधायक उपक्रमांचे आयोजनच होत नव्हते. ग्रामगीता भवनाचे उद्घाटन झाल्यानंतरदेखील तिथे कुठलेही आयोजन झाले नव्हते. ‘लोकमत’ने या बाबीवर प्रकाश टाकल्यानंतर तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव भजन प्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नियमितपणे विधायक कार्यक्रमाचे आयोजन होत नसल्याने विद्यार्थीच अस्वस्थ होते. यातूनच विद्यार्थ्यांनी एकत्र येत त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त सामुदायिक प्रार्थनेचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला व मागील आठवड्यापासून त्याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी सुरू झाली.डॉ. गोपाल हजारे यांच्या पुढाकाराने विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी ग्रामगीता भवनात एकत्र येऊन प्रथम मौन प्रार्थना नंतर मंगल स्तवन, प्रार्थना व राष्ट्रवंदनेचे पठन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ.प्रमोद मुनघाटे हेदेखील उपस्थित होते. सध्या वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांनी विद्यापीठ गाजत असताना नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे. (प्रतिनिधी)ग्रामगीता भवन तरुणांचे प्रेरणास्थान करणारविद्यार्थ्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन दर गुरुवारी होणार आहे. ग्रामगीता भवन हे विद्यापीठातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील तरुणांचे प्रेरणास्थळ व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मत डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी व्यक्त केले. ग्रामगीता भवनात सुसज्ज ग्रंथालय, संशोधनाच्या सोयी या बरोबरच महाराजांच्या जीवनावरील कायमस्वरूपी दृकश्राव्य प्रदर्शनी होणार आहे. महाराजांच्या जीवन, कार्य आणि साहित्यावरील विविध स्पर्धा, पथनाट्ये, कलापथके, युवकांची शिबिरे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा येत्या सत्रापासून आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.