शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

बँकांनी वेळेवर कर्जपुरवठा करावा : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:19 IST

शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी कर्जमेळावे घ्यावेत, १३४ कोटी ४३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.बचतभवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप तसेच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे आदी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी विविध बँकांना ९७९ कोटी ९५ लक्ष रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ १३ हजार ६९४ खातेदार शेतकऱ्यांना १३४ कोटी ४३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप केले आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकºयांना शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीसाठी कर्जाची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक गावात तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी शाखानिहाय कर्ज मेळावे आयोजित करावेत. या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.खरीप कर्ज वाटपासाठी मागील वर्षी उद्दिष्टापैकी केवळ ७२४ कोटी रुपये म्हणजेच ६० टक्के कर्जवाटप पूर्ण केले होते. परंतु यावर्षी दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बँकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची सूचना करताना बावनकुळे म्हणाले की, महसूल विभाग व सहकार विभागातर्फे आवश्यक असलेली संपूर्ण मदत बँकांना देण्यात येईल.शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ३५६ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ५० हजार २९१ शेतकऱ्यांचे ३४१ कोटी ५५ लक्ष रुपयांचे कर्जमाफी, ओटीएस योजनेमध्ये ५ हजार ५५७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९५ लक्ष रुपये तर इन्सेन्टिव्ह योजनेमध्ये १४ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.प्रारंभी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे यांनी खरीप कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट व विविध बँकांनी कृषी कर्जपुरवठा यासंदर्भात केलेल्या कामांचा आढावा घेतला.विशेष काऊंटर सुरू करावेराष्ट्रीयकृत बँकांनी १० हजार ८९२ शेतकऱ्यांना १०८ कोटी ४१ लक्ष रुपयांचे कर्ज दिले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ४७२ खातेदारांना २१ कोटी ७५ लाख तर ग्रामीण बँकांनी ३३० खातेदारांना ४ कोटी २९ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले असून कर्जवाटपाच्या तुलनेत केवळ १३ ते २४ टक्केच काम बँकांनी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ६ टक्के , बँक ऑफ बडोदा १९ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ३३ टक्के तर बँक ऑफ इंडियातर्फे ३१ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले आहे. कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्वच बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकºयाला योग्य मार्गदर्शन करून जास्तीत-जास्त कर्जपुरवठा कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी बँकांनी विशेष काऊंटर सुरू करावे, असे निर्देशही यावेळी दिले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbankबँकFarmerशेतकरी