शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा भिंतीअभावी रेल्वेत वाढले असामाजिक तत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : नागपूर ते अजनी दरम्यान सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून धूळखात आहे. यामुळे रेल्वेच्या परिसरात असामाजिक तत्त्वांची ...

नागपूर : नागपूर ते अजनी दरम्यान सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव मागील चार वर्षांपासून धूळखात आहे. यामुळे रेल्वेच्या परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हे रखडलेले काम त्वरित पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपूर ते अजनी दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. प्लॅटफाॅर्मवर येण्यापूर्वी अनेकदा सिग्नल न मिळाल्यामुळे या परिसरात रेल्वेगाड्या सिग्नल मिळण्याची वाट पाहत उभ्या असतात. याचा फायदा घेऊन अनेकदा असामाजिक तत्त्व रेल्वेगाड्यात शिरतात. ते प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे महागडे मोबाईल, साहित्य लंपास करतात. तर अनेकदा रेल्वेचे लोखंड रेल्वे रुळाशेजारी पडून असते. हे लोखंड चोरी करण्यात येते. सुरक्षा भिंतच नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळाच्या बाजूला पोहोचतात. त्यांना हटकण्यासाठी आऊटरकडील भागात आरपीएफचे जवानही हजर राहत नाहीत. याचाच फायदा असामाजिक तत्त्व घेतात. अनेकदा अवैध व्हेंडरही सुरक्षा भिंत नसल्यामुळे या भागातून रेल्वेगाड्यात प्रवेश करतात. या सर्व बाबींना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नागपूर ते अजनी दरम्यान त्वरित सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

...........

प्रवाशांचा मोबाईल पाडतात खाली

अनेकदा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी प्रवासी कोचच्या दारावर मोबाईलवर बोलत बसतात. आऊटरकडील भागात असामाजिक तत्त्व हातात काठ्या घेऊन उभे राहतात. प्रवासी मोबाईलवर बोलताना दिसल्यास हे असामाजिक तत्त्व काठी मारून प्रवाशाचा मोबाईल खाली पाडतात आणि मोबाईल घेऊन पसार होतात. अशा घटना अनेकदा घडल्या तरीसुद्धा सुरक्षा भिंत बांधण्यासंदर्भात दिरंगाई करण्यात येत आहे.

सुरक्षा भिंत महत्त्वाची

रेल्वे परिसरात असामाजिक तत्त्वांची संख्या वाढत आहे. सुरक्षा भिंत नसल्यामुळे असामाजिक तत्त्व सहज रेल्वे रुळापर्यत पोहोचतात. त्यामुळे असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित सुरक्षा भिंत उभारणे गरजेचे आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाने आऊटरकडील भागात आरपीएफ जवानांची ड्युटी लावणे गरजेचे आहे.

-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र.