शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 20:18 IST

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली.

ठळक मुद्देसंजय राऊत यांच्याकडून पाठराखणभाजपच्या घोटाळ्यांचीही चौकशी सुरू

नागपूर : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून फसविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली.

शिवसंपर्क अभियानांतर्गत संजय राऊत हे तीन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, देशमुख यांच्यावर हेतूपुरस्सर सीबीआयचे २२, ईडीचे ५० व आयटीचे ४० हून अधिक छापे टाकून विक्रम केला गेला. त्याच्याबाबत आलेल्या तक्रारींची पूर्णपणे शहानिशा करण्यात आली नाही. देशमुखांबाबत निर्णय घेण्यात महाविकास आघाडीकडून घाई झाल्याची कबुली त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात चंद्रपुरातील जलयुक्त शिवारसह विविध कामांत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे आले आहेत. या सर्व प्रकरणांचा राज्याचे पोलीस तपास करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: लक्ष ठेवून आहेत. लवकरच कारवाया झालेल्या दिसतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. पत्रकार परिषदेला खा. कृपाल तुमाने, खा. राहुल शेवाळे, आ. दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कन्हेरे, प्रमोद मानमोड़े, किशोर कुमेरिया, नितीन तिवारी, दीपक कापसे, विशाल बरबटे, आदी उपस्थित होते.

आता भाजपशी घरोबा नाही

- गेली २५ वर्षे भाजपशी घरोबा केला. विचारधारा एक होती. मात्र, काही कारणास्तव वेगळा मार्ग निवडताच भाजप शिवसेनेशी सूडाने वागली, हे विसरता येणार नाही. आता शिवसेना टोकाला गेली आहे, ती खाली येणे शक्य नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

जनाब भागवत म्हणायचे का?

देशात २४ कोटी मुस्लिम आहेत. त्यातील अनेक लोक भाजप व शिवसेनेला मतदान करतात. भाजप राष्ट्रीय मुस्लिम मंच चालवते. भाजपचे केरळचे राज्यपाल मुस्लिम आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काळातील बरीच वक्तव्ये मुस्लिम पोषक आहेत. मग त्यांना जनाब भागवत म्हणणार का, असा सवाल राऊत यांनी केला. जिनाने एकवेळ फाळणी केली; पण देशात धार्मिक विद्वेष निर्माण करून दररोज फाळणी करणे सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

एमआयएमसोबत कधीच युती नाही

- भाजप व एमआयएमने उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये छुपी युती केली होती. निकालांवरून ते स्पष्ट झाले आहे. आता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावरच एमआयएमने युतीची ऑफर दिली आहे. मात्र, शिवसेना कधीच एमआयएमसोबत युती करणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

चित्रपटाने पीओके मिळणार नाही

- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने काश्मिरी पंडितांना आसरा दिला. गेल्या सात वर्षांत फक्त १६ टक्के काश्मिरी पंडितांना घरे देण्यात आली. एखादा चित्रपट काढून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारताला मिळणार नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत