शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

अन् मजुराची पत्नी ट्रकचालकाचे भक्ष्य होता होता वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:21 IST

जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देम्हणून ट्रकमध्ये बसण्याची वाटते भीती साक्षीदार जोडप्याने कथन केला प्रसंग

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकमध्ये बसवतो पण महिला केबिनमध्ये बसेल आणि माणसाला मागे बसावे लागेल, ही ट्रकचालकाची अट. बिहारकडे पायी जाणारे अगतिक मजूर जोडपे पर्याय दिसत नसल्याने बसण्यास तयार झाले. ट्रक भरधाव वेगाने निघाला तसा सावज मिळाल्याचा विचार बाळगून असलेल्या ट्रकचालकाची हालचाल सुरू झाली. जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली केले. एक अगतिक महिला नराधमाचे भक्ष्य होता होता वाचली.जळगाववरून एसटी बसने रात्री २ वाजताच्या सुमारास नागपूरला आलेले काही मजूर पांजरी नाक्यावर थांबले. त्यातीलच नितीन व रंजना या मजूर दाम्पत्याला यवतमाळ जिल्ह्यात मुकुटबन येथे जायचे होते. सकाळी नाक्यावर पोहचलेल्या संघर्ष वाहिनीच्या टीमने या जोडप्याला त्यांच्या गावी पोहचण्यासाठी ट्रकमध्ये व्यवस्था केली तेव्हा त्यांनी ट्रकमध्ये बसण्यास नकार दिला आणि बिहारच्या जोडप्यासोबत घडलेल्या थरारक प्रसंगाचे कथन केले. हे जोडपेही जळगाव येथून गावी यवतमाळला येण्यासाठी निघाले होते. रस्त्यावर उभे असताना त्याच नराधम ट्रकचालकाने यांनाही त्याच अटीसह ट्रकमध्ये बसण्यास सांगितले पण यांनी त्याला नकार दिला. मात्र त्यांच्याच सोबत असलेले बिहारचे दाम्पत्य ट्रकमध्ये बसले. त्यानंतर मागहून आलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये २०-२५ इतर मजुरांसह आम्ही बसल्याचे नितीनने सांगितले. नशिराबाद येथे पोहचल्यानंतर हा ट्रक दिसला. संतप्त गावकऱ्यांनी आमचाही ट्रक रोखला आणि घडलेला प्रसंग समजला. गावकऱ्यांनी त्या ट्रकचालकला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे कळले. ते जोडपेही पोलीस स्टेशनमधेच होते. यानंतर आम्ही बसलेला ट्रकचालकही गावकऱ्यांच्या दबावामुळे आम्हाला सोडून निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी जळगाव नागपूर बसमध्ये आमची व्यवस्था केली आणि आम्ही इथवर पोहोचल्याचे नितीनने सांगितले.

मोबाईल विकून निघालोनितीन जळगाव येथे एका कंपनीत कामाला असून पत्नीसह राहतो. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर मालकाने ४००० रु दिले. मात्र दोन महिन्यात घरभाडे व इतर खर्चात हा पैसा संपला. नाईलाज असल्याने गावी मुकुटबनला निघण्याचे ठरविले. स्वत:जवळचा मोबाईल ४०० रुपयात विकला आणि गावचा रस्ता धरला. हे पैसे ट्रकवाल्याला दिले. आता एक रुपया खिशात नाही. एसटी बसने नि:शुल्क नागपूरपर्यंत आणले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMolestationविनयभंग