शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

विदर्भाचा स्वतंत्र मराठी वाङ्‌मयीन इतिहास १२ खंडांतून उपलब्ध होणार

By निशांत वानखेडे | Updated: February 27, 2025 11:40 IST

पहिल्यांदाच होत आहे प्रादेशिक संशोधन : वाचक, अभ्यासक, संशोधकांसाठी मोलाची भेट

निशांत वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अभिजात असलेल्या मराठी भाषेच्या एकूणच वाङ्‌मयीन इतिहासात विदर्भाचे योगदान कायमच अनुल्लेखित राहिले आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी विदर्भातील साहित्यिक, मराठी अभ्यासक, संशोधकांनी मोठी धुरा खांद्यावर घेतली आहे. अगदी प्राचीन काळापासून ने आतापर्यंतचा विदर्भातील वाङ्मयीन इतिहास धुंडाळून तो १२ खंडांतून वाचकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातील ४ खंड हे पूर्णत्वाच्या तयारीत आहेत. हे खंड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे प्रकाशित केले जाणार आहेत.

मराठी वाङ्‌मयाच्या समग्र इतिहास लेखनात महाराष्ट्रातील विविध विभागांच्या, विविध वाङ्‌मय प्रकारांच्या इतिहासाची दखल पुरेशी घेतली जाऊ शकलेली नाही. एखाद्या वाङ्‌मय प्रकाराचा प्रदेशनिहाय समग्र इतिहासाचा ग्रंथदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे प्रादेशिक लेखन, लेखक, त्यांचे कार्य, कर्तृत्व, प्रादेशिक प्रतिभा यांचे उल्लेखदेखील मराठी वाङ्‌मयाच्या उपलब्ध इतिहासात वगळले गेले आहेत.

इतिहासातून सुटुन जाणाऱ्या महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय असूनही अनुल्लेखित राहणाऱ्या वैदर्भीय प्रतिभेचे दर्शन, वेगळ्या वाटा, प्रवाह, वळणे, प्रतिभा यावर भर असणाऱ्या नोंदीचे स्थानिक, प्रादेशिक वाङ्‌मय इतिहास लिहिले जाण्याची गरज आहे. त्या दृष्टीने 'मराठी वाङ्‌मयाचा वैदर्भीय इतिहास' हा एक प्रकल्प या प्रकल्पाचे संकल्पक आणि संपादक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी हाती घेतला आहे. विदर्भातील सर्वच पिश्चांचे लेखक, लेखन, प्रवाह, दर्जा, गुणवत्ता, प्रभाव, परिणाम यांचे एकत्र असे प्रातिनिधिक दर्शन या प्रकल्पामुळे प्रथमच घडणार आहे. प्रत्येक वाङ्मय प्रकारात उल्लेखनीय असे काही सुटू नये आणि हे खंड सर्वसमावेशक व्हावे यासाठी लेखकांनी, वाचकांनी, अभ्यासक, संग्राहक, तसेच इतर सान्यांनी माहिती पुरवावी, असे आवाहन श्रीपाद जोशी यांनी केले.

तीन कालखंडात विभागणी

  • विदर्भातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, ललित गद्य, चरित्र-आत्मचरित्र, बालसाहित्य, वैचारिक/शास्त्रीय लेखन, सैद्धांतिक/तात्त्चिक लेखन, अनुवादित साहित्य, लोकसाहित्य, भाषा अशा विविध प्रकारातील प्रत्येकी सुमारे २५० पृष्ठांचा एक खंड या प्रकल्पांतर्गत लिहून घेऊन ते खंड प्रकाशित केले आप्णार आहेत.
  • प्रत्येक खंडातील प्रत्येक प्रकारात प्राचीन काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत स्वातंत्र्यपूर्व कालखंड, १९४७ ते १९९० हा स्वातंत्र्योत्तर कालखंड व १९९० ते आजतागायत असा नव्वदोत्तरी कालखंड असा वाङमयाचा प्राचीन ते अद्ययावत इतिहास उपलब्ध करून दिला जाणार आहे.

"खरे तर हे काम प्रत्येक विभागातील विभागीय साहित्य संस्थेने केशाय करणे आवश्यक होते, मात्र ते झालेले नसल्याने हा प्रकल्प हाती घ्यावा लागला आहे. वैदर्भीय मराठी वाडमयाचा इतिहास या निमित्ताने प्रथमच उपलब्ध होणार आहे."-श्रीपाद भालचंद्र जोशी

टॅग्स :marathiमराठीnagpurनागपूरVidarbhaविदर्भ