शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यामुळे शेतीत सकारात्मक बदल होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकाधिकारशाही संपुष्टात येणार आहे. हे शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे. ...

नागपूर : केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील एकाधिकारशाही संपुष्टात येणार आहे. हे शेतकऱ्यांसाठी हिताचे आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडणार असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष ललित पाटील बाहाळे यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यासंबंधी गठित केलेल्या समितीसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करण्यात आली. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ललित पाटील बाहाळे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने नियंत्रकाची भूमिका सोडून सुविधा पुरवठादार म्हणून सेवा क्षेत्रात स्पर्धा करावी, असा संकेत कायद्याद्वारे देण्यात आला आहे. शेती मालाच्या खरेदी-विक्री व्यवहारात कुणीही सहभागी होऊ शकत असल्यामुळे एक व्यापक बाजार उभा होण्यास मदत होणार आहे. नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदार, तज्ज्ञ व सेवा पुरवठादारांशी करार करून या क्षेत्रातील उत्पादकांचे सशक्तीकरण करणे शक्य होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या मालात खराब माल मिसळण्यात येत असल्यामुळे ते भेसळीचे केंद्र असल्याचे बाहाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी झाले पाहिजे. तसेच शासनाला युद्धजन्य किंवा दुष्काळाच्या स्थितीतच शेती मालाच्या किमतीवर नियंत्रणाचा अधिकार असला पाहिजे. आवश्यक वस्तू कायद्यातील सुधारणा सदोष असल्याचे समितीच्या लक्षात आणून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विलास ताथोड उपस्थित होते.

.............