शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

मनपात ८० टक्के पदे रिक्त; उद्दिष्ट मात्र पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:57 AM

उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे २.७० कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात याहून अधिक वाढ झाली असती. परंतु ८ ऑक्टोबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उंच इमारतींवर आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्यात आले आहे. ही वसुली सुरू राहिली असती तर हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला मदत झाली असती. उंच इमारतींवर शुल्क आकारण्याचा सुधारित प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.अग्निशमन विभागाचे मुख्य काम नैसर्गिक आपत्ती वा आगीची घटना घडल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान रोखण्याचे आहे. आपली जबाबदारी पार पाडून विभागाने शुल्क वसुलीतही आघाडी घेतली आहे. रिक्त पदे भरून विभागाला बळ देण्याची गरज आहे. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. असे असूनही या विभागातील कर्मचारी व अधिकारी सक्षमतेने काम करीत आहेत.विभागात सशक्त कर्मचाऱ्यांची गरज असते. या विभागातील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आले आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला शुल्क वसुलीतून ११ लाख ७८ हजार ९८२ रुपये, पाणीपुरवठा, विहीर सफाई, फटाके, पर्यावरण शुल्क यातून १ कोटी ५ लाख ९१ हजार ५८४ रुपये, उंच व लहान इमारत निरीक्षण शुल्क, अग्निशमन सेवा शुल्क यातून १ कोटी ५२ लाख २५ हजार ८१६ रुपये उत्पन्न झाले.बचाव कार्यासाठी कर्मचारी नाहीशहरात आठ अग्निशमन स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनवर २४ तास कर्मचारी ड्युटीवर असतात. विभागातील पदे रिक्त होत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. एखादी मोठी घटना घडल्यास बचावासाठी कर्मचारी व वाहन उपलब्ध करताना विभागाला चांगलीच कसरत करावी लागते. सध्या ९० फायरमन कार्यरत आहेत. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधून सज्ज आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याने ते सुरू झालेले नाही. ५६ चालकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून फायरमनचे काम करून घेणे शक्य आहे.सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्ट पूर्तीअग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती वा आग आटोक्यात आणताना कुशल मनुष्यबळाची गरज असते. परंतु पदे रिक्त असल्याने अडचणी येतात. असे असूनही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून प्रयत्न केले जातात. उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक शुल्क वसुली झाली आहे. ही चांगली बाब आहे. क र्मचारी व अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.राजेंद्र उचके,अग्निशमन अधिकारी महापालिका

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी