शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

१५ वे राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २७ व २८ ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:38 PM

यावर्षीचे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन येत्या २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून मेंढा-लेखा या गावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भास्कर पेरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमेंढा-लेखा येथे आयोजन : भास्कर पेरे संमेलनाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षीचे १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन येत्या २७ व २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असून मेंढा-लेखा या गावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भास्कर पेरे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.संमेलनाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर हे या संमेलनाचे उदघाटक  म्हणून उपस्थित राहतील. २७ जानेवारीला ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या दारी’ या नवीन उपक्रमातून या संमेलनाची सुरुवात होणार असून आयोजक पदाधिकारी राष्ट्रसंतांच्या मानवतेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शाळा महाविद्यालयात जाणार आहेत. याअंतर्गत पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. २८ जानेवारीला मेंढा-लेखा या गावी प्रत्यक्ष संमेलन होणार असून यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. यादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाव्रती पुरस्कार वितरण, परिसंवाद, मुलाखती, मनोरंजनातून प्रबोधन असे कार्यक्रम होणार असल्याचे रक्षक यांनी सांगितले.नागपूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात राष्ट्रसंतांची ग्रामगीतेचा समावेश करण्यात आल्यानंतर अशा संमेलनाची संकल्पना पुढे आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर चिंतन मंथन व्हावे व या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी १९९६ पासून राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. डॉ. सुभाष सावरकर हे पहिले संमेलनाध्यक्ष व डॉ. मधुकर आष्टीकर हे उदघाटक  होते. त्यानंतर राष्ट्रसंत साहित्य संमेलनाला सर्वच स्तरातून प्रतिसाद वाढत गेला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठ स्तरावर पाच संमेलने घेण्यात आली. भारतीय विचारमंच या संस्थेनेही संमेलन आयोजनात मोलाचा वाटा उचलला. गावोगाव राष्ट्रसंतांचे विचार पोहचावे हा या संमेलनामागचा उद्देश असल्याचे रक्षक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजnagpurनागपूर