शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १,५६३ नमुने फ्लोराईडबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:47 IST

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

ठळक मुद्देनागपूर, चंद्रपुरात प्रमाण सर्वाधिकजलस्वराज प्रकल्पात उपाययोजनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत. विदर्भात सर्वाधिक प्रमाण नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात असून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून यावर उपाययोजना केली जात आहे.भूगर्भामध्ये रूपांतरित खडकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागामध्ये असे फ्लोराईडयुक्त पाणी आहारात वापरण्यात आल्याने हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे पडणे, पाय वाकडे होणे असे प्रकार आढळायला लागले होते. त्यामुळे शासनाने २००२ पासून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून अशा गावांची निवड करून उपाययोजना केल्या होत्या. जलस्वराज प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर २०१६ पासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत २०२० पर्यंत संबंधित गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत.गावांमध्ये असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी गावाच्या जलसुरक्षकाकडून नमुने गोळा केले जातात. त्याची तपासणी उपविभागीय, जिल्हास्तर आणि विभागीय प्रयोगशाळामंमध्ये केली जाते. नागपूर विभागात विभागस्तरावर एक प्रयोगशाळा असून जिल्हास्तरावर ५ आणि उपविभाग स्तरावर २५ प्रयोगशाळा आहेत. याचे सनियंत्रण उपविभागीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी नियंत्रण व गुणवत्ता अधिकाऱ्यांकडे असते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे हे एक पद निमाण करण्यात आले आहे. गावातील विहिरींच्या किंवा बोअरवेलच्या पाण्यामध्ये १.५ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लोराईड आढळल्यास ते पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते. असे १ हजार ५६३ नमुने जुलै महिन्याअखेरच्या तपासणीमध्ये फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

यापूर्वी झालेल्या उपाययोजनांमध्ये जलस्वराज प्रकल्प-एकच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात सावनेर, काटोल, पारशिवनी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डोंगरगाव येथे डी फ्लोरिडेशन युनिट लावण्यात आले आहेत.नागपूर विभागामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. संबंधित गावांमधील पाण्याचे नमुने गोळा करून आलेल्या अहवालानंतर उपविभागीय सनियंत्रकांकडून त्यावर उपायोजना केल्या जातात. जलस्वराज प्रकल्पात याचा समावेश असून त्या माध्यमातून उपायोजना सुरू आहेत.- डॉ. शिवाजी पदमने,प्रभारी उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

 

टॅग्स :Waterपाणी