शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

नागपूर विभागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे १,५६३ नमुने फ्लोराईडबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 8:44 PM

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

ठळक मुद्देनागपूर, चंद्रपुरात प्रमाण सर्वाधिकजलस्वराज प्रकल्पात उपाययोजनांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १ हजार ५६३ नमुने फ्लोराईडयुक्त आढळले आहेत. विदर्भात सर्वाधिक प्रमाण नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात असून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून यावर उपाययोजना केली जात आहे.भूगर्भामध्ये रूपांतरित खडकांचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागामध्ये असे फ्लोराईडयुक्त पाणी आहारात वापरण्यात आल्याने हाडे ठिसूळ होणे, दात पिवळे पडणे, पाय वाकडे होणे असे प्रकार आढळायला लागले होते. त्यामुळे शासनाने २००२ पासून जलस्वराज प्रकल्पाच्या माध्यमातून अशा गावांची निवड करून उपाययोजना केल्या होत्या. जलस्वराज प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर २०१६ पासून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत २०२० पर्यंत संबंधित गावांमध्ये उपाययोजना केल्या जाणार आहेत.गावांमध्ये असलेल्या विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी गावाच्या जलसुरक्षकाकडून नमुने गोळा केले जातात. त्याची तपासणी उपविभागीय, जिल्हास्तर आणि विभागीय प्रयोगशाळामंमध्ये केली जाते. नागपूर विभागात विभागस्तरावर एक प्रयोगशाळा असून जिल्हास्तरावर ५ आणि उपविभाग स्तरावर २५ प्रयोगशाळा आहेत. याचे सनियंत्रण उपविभागीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी नियंत्रण व गुणवत्ता अधिकाऱ्यांकडे असते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडे हे एक पद निमाण करण्यात आले आहे. गावातील विहिरींच्या किंवा बोअरवेलच्या पाण्यामध्ये १.५ मिलिग्रॅम प्रति लिटर फ्लोराईड आढळल्यास ते पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते. असे १ हजार ५६३ नमुने जुलै महिन्याअखेरच्या तपासणीमध्ये फ्लोराईडयुक्त आढळले आहेत.

यापूर्वी झालेल्या उपाययोजनांमध्ये जलस्वराज प्रकल्प-एकच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात सावनेर, काटोल, पारशिवनी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डोंगरगाव येथे डी फ्लोरिडेशन युनिट लावण्यात आले आहेत.नागपूर विभागामध्ये नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. संबंधित गावांमधील पाण्याचे नमुने गोळा करून आलेल्या अहवालानंतर उपविभागीय सनियंत्रकांकडून त्यावर उपायोजना केल्या जातात. जलस्वराज प्रकल्पात याचा समावेश असून त्या माध्यमातून उपायोजना सुरू आहेत.- डॉ. शिवाजी पदमने,प्रभारी उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

 

टॅग्स :Waterपाणी