शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही मागास ! सर्वांगीण विकासाचे दावे फोल; गरीब, अतिगरीब जिल्ह्यांकडे दुर्लक्ष

By shrimant mane | Updated: December 12, 2025 13:56 IST

२७ जिल्ह्यांची अवस्था 'पंगत बसली अन् बुंदी संपली'! दरडोई उत्पन्नात १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही बिमारू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राची प्रगती केवळ नऊ जिल्ह्यांमध्ये दिसते. उरलेले २७ जिल्ह्यांची अवस्था 'विकासाची पंगत बसली अन् बुंदी संपली' अशी आहे. यांपैकी अतिगरीब १२ जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, ३० वर्षे राज्याच्या विकासाचे जिल्हानिहाय मोजमाप झालेले नाही. विधिमंडळाच्या पावित्र्य आणि परंपरा लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या मुद्द्यावर गंभीरपणे चर्चा होणार का, हा सवाल आहे.

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचे रोज नवनवे दावे केले जात असले तरी जिल्ह्यांची नेमकी प्रगती किती झाली, हे तपासण्याचे दरडोई उत्पन्न हेच त्यातल्या त्यात विश्वासार्ह असे साधन आहे. कारण, विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र ही वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली तेव्हाच्या, १९९४ मधील दिवंगत भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निर्देशांक व अनुशेष समितीनंतर गेल्या ३० वर्षांमध्ये जिल्ह्याजिल्ह्यांच्या विकासाचे मोजमाप झालेले नाही. तिन्ही विकास मंडळांतील वैधानिक शब्द निखळून पडल्यालाही आता पाच वर्षे झाली आहेत. सध्या ही मंडळे कागदावरच आहेत. त्यांना मुदतवाढ मिळविण्याची सतत मागणी होत असताना शासन फार काही करताना दिसत नाही. 

महाराष्ट्राची सगळी प्रगती उपनगरसह मुंबई, पालघरसह ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर व सिंधुदुर्ग हे पश्चिम पट्टयातील जिल्हे व नागपूर अशा मिळून नऊ जिल्ह्यांमध्येच एकवटली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात राज्याचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख, ७८ हजार ६८१ रुपये होते आणि केवळ हे ९ जिल्हेच या सरासरीच्या पुढे होते, आताही आहेत.

नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या विभागीय मुख्यालयांसह सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सातारा, अहिल्यानगर, वर्धा, चंद्रपूर, अकोला, भंडारा, लातूर, धाराशिव व धुळे हे १५ जिल्हे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीच्या खाली आहेत.

सर्वात गंभीर बाब म्हणजे गोंदिया, जळगाव, नांदेड, जालना, बीड, परभणी, यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम व नंदुरबार या बारा जिल्ह्यांमधील सरासरी दरडोई उत्पन्न, तर १ लाख, ८८ हजार ८९२ रुपये या देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. याचा अर्थ हे जिल्हे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड वगैरे गरीब राज्यांपेक्षा बिमारू आहेत.

केळीचे आगर समजला जाणारा जळगाव हा कधी काळी अत्यंत समृद्ध असणारा जिल्हा आधीच्या २०२२-२३ आर्थिक वर्षात मधल्या टप्प्यातील सोळावा जिल्हा होता. नंतर दरडोई उत्पन्न घसरले आणि जळगाव हादेखील अतिगरीब जिल्ह्यांच्या यादीत आला.

हे निधीवाटप मुळात लोकंसंख्येच्या प्रमाणात व्हायला हवे. तसे ते होताना दिसत नाही. अर्थात, केवळ लोकसंख्या हा एकमेव निकष असू शकत नाही. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हा आणखी एक निकष असू शकतो. कारण, रस्त्यांसाठी निधी मंजूर करताना अंतर व क्षेत्रफळ महत्त्वाचे असते. जंगल अधिक असलेले जिल्हे हा तिसरा निकष असू शकतो. कारण, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती किंवा गोंदिया या जंगल व आदिवासींचे प्रमाण अधिक असलेल्या जिल्ह्यांना विशेष प्रकल्पांसाठी अधिक निधी द्यायला हवा. गडचिरोलीसारख्या ज्या जिल्ह्यांना विकासासाठी अधिक पायाभूत सुविधांची गरज आहे, तिथे अधिक निधी द्यायला हवा. गडचिरोलीला तसा तो दिला जात आहे. पण, हाच नियम यवतमाळ व चंद्रपूरला लावला जात नाही. ते पाहता जिल्ह्यांच्या वार्षिक आराखड्याचा आकार राजकीय भूमिकांमधून ठरत नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो.

तोंड पाहून निधी दिला जातो का?

लोकसंख्येचा विचार करता, विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वार्षिक आराखड्यांना दिलेल्या निधीत मोठी तफावत आढळून आली आहे. वित्त व नियोजन विभागाने काही जिल्ह्यांवर विशेष कृपा दाखविली आहे, तर काही जिल्ह्यांवर अन्याय झाला आहे. चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, अकोला या चार जिल्ह्यांवरील अन्याय तर स्पष्ट दिसून येतो. वार्षिक आराखड्याचे हे तपशील पाहा...

जिल्हा               लोकसंख्या (२०११)              वार्षिक आराखडा

नागपूर                 ४६,५३,१७१                              १०४७ (₹ कोटी)अमरावती            २८,८७,८२६                              ६५७बुलढाणा              २५,८८,०३९                              ५१९.४३अकोला               १८,१८,६१७                                ३३३वाशीम                ११,९६,७१४                                 ३१५यवतमाळ            २७,७५,४५७                               ५२८वर्धा                    १२,९६,१५७                               ४१२.७०गोंदिया                १३,२२,३३१                                २४०भंडारा                 ११,९८,८१०                                २७६चंद्रपूर                २१,९४,२६२                                ३४०.८८गडचिरोली          १०,७१,७९५                                ६९७

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra: 12 districts poorer than Uttar Pradesh, Bihar; development claims fail.

Web Summary : Maharashtra's progress is limited to nine districts. Twelve districts have lower per capita income than the national average, lagging behind even states like Uttar Pradesh and Bihar. Regional imbalances persist due to unequal fund allocation, especially affecting Vidarbha's districts despite higher populations.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरVidarbhaविदर्भAkolaअकोलाAmravatiअमरावतीAhilyanagarअहिल्यानगरPuneपुणेthaneठाणेMumbaiमुंबईwashimवाशिमJalgaonजळगाव