शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

कामात रमलेले संजयमामा

By admin | Updated: November 8, 2014 18:41 IST

अगदी हटयोग करूनही गर्व दूर न होऊ शकलेले अनेक जण असतात. काही जण मात्र काहीच न करताही योगाचे मूळ जाणल्यासारखे जगतात. अशी माणसे साधीसुधी असतात. त्यांच्या वागण्याबोलण्यातून कायम शांती, समाधान व्यक्त होत असतं. अशाच एका मातीतल्या माणसाची ही गोष्ट.

 डॉ. संप्रसाद विनोद

 
 
काही माणसं मुळातच खूप वेगळी असतात. त्यांचं वागणं, बोलणं, बसणं, उठणं, काम करणं सगळंच वेगळं असतं. त्यामुळेच ते सहज उठूनही दिसतं. शिवाय, आपण सगळ्यात उठून दिसावं, असा त्यांचा हेतू नसेल, तर त्यांच्या वेगळेपणाचा अधिक चांगला प्रभाव पडतो. संजयमामा हे अशाच काही विरळ्या लोकांपैकी एक आहेत. सदैव हसतमुख, तरतरीत दिसणार्‍या मामांचं शिक्षण फक्त १0 वीपर्यंत झालंय. पण, कुठलीही नवीन गोष्ट चटकन शिकून घेण्याची आणि आत्मसात करण्याची त्यांची क्षमता पाहिली, की असं वाटतं की लहान वयात त्यांना शिक्षणाची संधी मिळाली असती, तर नक्कीच त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेऊन मिळालेल्या संधीचं चीज केलं असतं!!
साडेपाच फुटांच्या आतबाहेर उंची असलेल्या मामांचं शरीर कष्टाने काटक, कणखर झालेलं आहे. मूळ कोकणातलं असल्यामुळं कष्टाळूपणा, परखडपणा, सरळपणा, मानीपणा, मनस्वीपणा, प्रामाणिकपणा, विश्‍वासार्हता तर त्यांच्या रक्तातच आहे. त्यांच्यासारखे मोलमजुरी करून पोट भरणारे कोकणातले असंख्य लोक आज पुण्यामुंबईत अनेक वर्षे वास्तव्याला आहेत. मुंबईतला ‘रामा गडी’ हा तर या सगळ्या गुणांचं प्रतीक बनलेला आहे. मामांचं वैशिष्ट्य असं, की त्यांचा परखडपणा, मानीपणा अस्सल कोकणी असला, तरी तो कधी अंगावर येणारा नसतो. त्यात आक्रमकता कमी आणि समजूतदारपणा अधिक असतो. हीच मला त्यांची खासियत वाटते. 
मामा आमच्याकडे कामाला आले ते त्यांच्या सासूबाईंच्या शिफारशीवरून. सासूबाई आधीपासून शांतिमंदिरमध्ये कामाला होत्या. या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. मामा रत्नागिरीतल्या एका छोट्याशा खेड्यातून प्रथमच पुण्याला आलेले असल्याने सुरुवातीला थोडे गांगरले. गडबडले. ते स्वाभाविकही होतं. पण, माझी पत्नी ऋजुता आणि मला त्यांची साफ नजर आणि नजरेतला  प्रामाणिक भाव खूप आवडला. दुसर्‍या दिवसापासून ते कामाला येऊ लागले. काम ठरलं, बागकाम आणि इतर घरगुती कामात मदत करणं.  ऋजुताला बागेची फार हौस. बागकाम आणि झाडांबाबत असणारी जाणही खूप चांगली. हा वारसा तिला तिच्या वडिलांकडून मिळालाय. तिच्या वडिलांनी तर लोकमान्यनगरमधल्या त्यांच्या छोट्याशा जागेत अनेक प्रकारची झाडं लावली आणि फुलवली होती. त्यातली काही निवडक फुलझाडं त्यांनी मोठय़ा प्रेमानं आपल्या लाडक्या लेकीकडं पाठवली.
ऋजुताने दिलेल्या सगळ्या सूचना नीट समजून घेत मामांचं काम सुरू झालं. आता इतकी वर्षं बागकाम केल्यामुळे ते या बाबतीत चांगलेच पारंगत झालेत. मामांना बागेत काम करताना पाहणंदेखील आनंददयी असतं. वेळेवर येऊन मनापासून, उत्साहाने, आपुलकीनं काम करणं, कामात कधी घाईगडबड-धसक फसक नसणं, सगळं लक्ष पूर्णपणे कामावर केंद्रित असणं, कुठलीही अनावश्यक बडबड न करता एकमार्गी, नेमून दिलेली सगळी कामं त्यांच्या वेळात  निगुतीने करणं आणि वेळ झाली, की तितक्याच शांतपणे निघून जाणं, कधीमधी थांबावं लागलं तर विनातक्रार थांबणं, हे सगळं त्यांच्या कामातून नेहमीच स्पष्टपणे जाणवतं. आमचा दीड वर्षाचा कुकू नावाचा पग जातीचा कुत्रादेखील रविवारी त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. मामा आले, की त्यांच्या अंगावर प्रेमाने उड्या मारतो. त्यांचं तोंड चाटतो. मामा मोठय़ा आनंदाने त्याला हे सगळं करू देतात. ठराविक दिवशी कुकूला प्रेमाने अंघोळ घालतात. त्यांना त्याची कधी घाण वाटत नाही. मामांमधले हे सगळे गुण पाहिले की मला प्रश्न पडतो, की कुठल्याही प्रकारची योगसाधना न करता या माणसात हे सगळे गुण आले तरी कुठून?
मामा व्रत-वैकल्यं, उपास-तापास, जपजाप्य, पारायण, नवस-सायास वगैरेमध्येही ते फारसे नसतात. चांगल्या संस्कारांची शिदोरी त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून मिळाली, हे तर उघड आहे. पण, त्यांचे आईवडीलदेखील फारसे काही शिकलेले नव्हते. तरीही त्यांनी मामांवर इतके छान संस्कार केले, हे विशेष. याउलट, खूप शिकलेल्या आईवडिलांची अत्यंत असंस्कृत मुलंही माझ्या पाहण्यात आहेत. म्हणजे, अभ्यासाचा, शिक्षणाचा आणि संस्कारांचा फारसा काही संबंध नसतो की काय? वर्षानुवर्षे हठयोगसाधना करणारे अनेक साधक माझ्या पाहण्यात आहेत. पण, मामांच्या वागण्या-बोलण्यातून सहजपणे प्रकट होणार्‍या गुणांचा त्यांच्यात मागमूसही दिसत नाही. हठयोगामुळे त्यांचं बाह्य शरीर निरोगी झालंय खरं, पण अंतरंग मात्र तसंच राहिलंय. खूप काळ उपासना करणार्‍यामध्येदेखील  वैचारिक बंदिस्तपणा, कर्मठपणा, विशिष्ट पद्धतीने उपासना करण्याचा दुराग्रह,  त्यातून निर्माण होणारा अभिमान, अहंकार दिसून येतो. मग हे सगळे उपासना प्रकार निरुपयोगी म्हणायचे का? नक्कीच नाही. पण,  कुठलीही उपासना करताना ती ‘जीवनस्पश्री’ होईल, याची खबरदारी घ्यायला हवी. जीवनस्पश्री म्हणजे जीवनातील प्रश्न सोडविण्यास आवश्यक असणारे गुण निर्माण करण्यास ती सर्मथ असणं. साधनेच्या, उपासनेच्या साह्याने आपलं अंतरंग, आपला दृष्टिकोन बदलणं. म्हणजे, मामांसारख्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यातून सहज प्रकट होणारं समाधान, शांती, प्रसन्नता आपल्या जीवनात येणं. साधनेच्या, उपासनेच्या ‘तपशिला’बरोबर त्यामागील ‘तत्त्व’ समजणं.  शब्दांबरोबरच त्या शब्दांमागील ‘भाव’ समजणं. ‘लेटर्स’ मागील ‘स्पिरिट’ जाणणं. हे जमलं तर मामांसारख्या साध्यासुध्या माणसाच्या कुशल ‘कर्मातून’ प्रकट होणारा ‘योग’ समजून घेणं कठीण जाणार नाही !! 
(लेखक हे महर्षी न्यायरत्न विनोद यांचा विशुद्ध अध्यात्माचा आणि अभिजात योगसाधनेचा वारसा चालविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगगुरू आणि योगोपचारतज्ज्ञ आहेत.)