शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

LMOTY 2020: जून 2021 पर्यंत ‘एअर इंडिया’ची विक्री निश्चित!; हरदीपसिंग पुरींनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:36 IST

Lokmat Maharashtrian of the year award 2020: 1975 साली एअरपोर्ट ट्राफिक 10 लाख होतं, आज ते 7 कोटींवर पोहोचलं आहे. विमानतळ खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांनी ही आकडेवारी समोर ठेवून बोललं पाहिजे. - हरदीपसिंग पुरी,  केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री

कोरोना महामारी दारात येऊन उभी राहिली तेव्हा सरकारचं प्रथम कर्तव्य होतं, त्या संकटाचा सामना. सरकारने २३ मार्च लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सरकारने आपलं सारं लक्ष्य आरोग्य क्षेत्रावर एकवटलं कारण लवकरात लवकर परिस्थिती आटोक्यात आणता यावी.  मार्चनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा व्हायला सुरुवात झाली. आरोग्य क्षेत्रात तर पीपीई किटपासून ते लस बनवण्यापर्यंत देशात उत्तम काम झालं. आज आपण जगातील अन्य देशांना लस पुरवत आहोत. कोरोनापूर्व काळात आपण म्हणायचो की हवाई वाहतूक क्षेत्रात आपण जगात तिसऱ्या स्थानावर आहोत. लॉकडाऊन उघडलं की आपण पुन्हा आधी होतो त्या स्थितीला पोहोचू अशी आशा होती; पण काही अडचणी समोर येत आहेत. 

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा प्रसार होतो आहे. काही राज्यांनी पुन्हा निर्बंध लावले आहेत. २५ मेपर्यंत देशातली हवाई वाहतूक ३० टक्के सुरू झाली होती, ती आता ८० टक्क्यापर्यंत खुली आहे. येत्या एप्रिलमध्ये शंभर टक्के हे क्षेत्र कामाला लागलेलं असेल. ‘रिवाइव’ आणि ‘रिक्लेम’ या दोन आधारांवर हे क्षेत्र उभं राहील. गेल्या काही काळापासून हवाई इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणावं अशी मागणी होते आहे. आज ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’च्या या व्यासपीठावर मी हे स्पष्ट करतो की माझा पाठिंबा आहे या विचाराला.  मात्र यात राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये सहभागी काही राज्यांचा या मागणीला विरोध आहे. महसूल हे त्याचं एक कारण असू शकतं. 

विमानतळ देखभाल, बांधणी यांच्या खासगीकरणाला राहुल गांधींसह अनेकांनी विरोध केला आहे. खासगी कंपन्या यात दाखल झाल्या तर महसुलावर परिणाम होईल, ही टीका मला मान्य नाही. मुंबई आणि दिल्ली हे देशातले सगळ्यात मोठे विमानतळ. ते खासगी क्षेत्राकडे ती सोपवण्याचा निर्णय २००६ मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात घेण्यात आला होता, याची आठवण असलेली बरी. खासगीकरणाचा अर्थ एवढाच की देखभालीचं काम खासगी उद्योगांना देण्यात आलं आहे, तेही काही विशिष्ट मुदतीसाठी! दिल्ली आणि मुंबई विमानतळ खासगी कंपन्यांना सोपवले त्यातून एअरपोर्ट अथॉरिटीला ३१ डिसेंबर २०२० पर्यंत २९,००० कोटी रुपये इतका निधी मिळाला. त्या पैशातून आम्ही अन्य विमानतळांचा विकास केला. येत्या काळात अजून ६ विमानतळं खासगी क्षेत्राकडे सोपवण्याची योजना आहे. मोदी सरकारला देशात अजून १०० धावपट्ट्या विकसित करायच्या आहेत. विमानतळ कामांना वेग द्यायचा आहे. 

खासगी क्षेत्राकडे विमानतळ सोपवण्याचा अर्थ एवढाच की त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आर्थिक स्रोत वाढवणं. १९७५ साली एअरपोर्ट ट्राफिक १० लाख होतं, आज ते ७ कोटींवर पोहोचलं आहे. विमानतळ खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांनी ही आकडेवारी समोर ठेवून बोललं पाहिजे. अमृतसर विमानळाची प्रवासी क्षमता ३५ लाख आहे, खासगीकरणानंतर ती १ कोटी होऊ शकेल. एअर इंडिया विकण्याबद्दलही देशात बरीच चर्चा आहे. आपल्या देशातले अनेक लोक एअर इंडियाला सरकारची संपत्ती मानतात, अडचणीला एअर इंडिया उभी राहील असं त्यांना वाटतं. मोदी सरकारने सगळा सारासार विचार करून असं ठरवलं की करदात्यांच्या कष्टाचा पैसा एअर इंडियावर खर्च करण्यापेक्षा खासगी क्षेत्राकडे या कंपनीचं कामकाज सोपवावं. आधीच्या सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे एअर इंडिया ६० हजार कोटी रुपयांच्या कर्जात रुतलेली आहे. एअर इंडियामधला सरकारचा १०० टक्के हिस्सा विकला जाणार आहे. २०२१ पर्यंत एअर इंडिया ही एक खासगी कंपनी झालेली असेल.

(एबीपी न्यूजच्या वृत्तनिवेदक  कुमकूम बिनमाल यांनी घेतलेल्या मुलाखतीचे शब्दांकन) 

टॅग्स :lokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020Air Indiaएअर इंडिया