शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Food: आपण रोज किती कांदे, बटाटे खातो? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:31 IST

Onions and Potatoes: स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. पण कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? 

- योगेश बिडवईस्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. कांदे आणि बटाटे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसले तरी त्यांचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्व जरासं कमी झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच या वस्तूंचे भाव वाढले की महागाईबरोबरच तो राजकीय मुद्दा बनतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? महाराष्ट्रात महिन्याला थोडेथोडके नव्हे तर एक लाख टन कांदे खाल्ले जातात, तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. कांदा, बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे.महाराष्ट्रात मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो.

५००० वर्षांपासून कांदा शेतीपृथ्वीवर ५ हजार वर्षांपासून कांदा शेती होते. उत्तर पश्चिम भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या डोंगराळ भागात कांद्याच्या उत्पादनास सर्वात आधी सुरुवात झाली. मध्य आशियातील डोंगराळ भाग हे कांद्याचे उत्पत्ती स्थान मानले जाते. 

केवळ ५ टक्के बटाट्याचे उत्पादनमहाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो. गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात. 

औषधी गुणधर्म कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे. हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 

भारतात कांदा वापरविभाग       महिना (व्यक्ती/किलो)ग्रामीण       ०.८४२ शहरी         ०.९५१ 

नाशिकची दादागिरी भारतात वर्षभरात दोन ते तीन वेळा कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.देशातील १७%  उत्पादन नाशिक विभागात आणि  १०%  उत्पादन  नाशिक जिल्ह्यात होते.महाराष्ट्रात देशातील कांदा उत्पादन होते. सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा आदी जिल्हे कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.विदर्भ व मराठवाड्यात कांदा उत्पादनात वाढ होत आहे. महाराष्ट्रात महिन्याला एक लाख टन कांदे आणि साधारणपणे ६०,००० टन बटाट्यांची मागणी

आपल्या शहरात दररोज किती कांदे, बटाटे खातात? शहर     कांदे (टन)     बटाटे (टन) मुंबई एमएमआर      १,०००              १,००० पुणे     ५००     ४००कोल्हापूर     १२०     ४० नागपूर     ३५०     ४०० औरंगाबाद     १००     ८०नाशिक     २००     ६० जळगाव    १५०     २५ सोलापूर     १०५     १०अकोला     ६०     १०अहमदनगर     ५०     १०महिन्याला एक व्यक्ती साधारण दीड किलो कांदा आणि ८०० ते ९०० ग्रॅम बटाटे खाते. खाद्यसंस्कृती आणि सामाजिक- आर्थिक स्थितीनुसार यात तफावत आहे. 

 

टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्र