शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

Food: आपण रोज किती कांदे, बटाटे खातो? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 11:31 IST

Onions and Potatoes: स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. पण कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? 

- योगेश बिडवईस्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. कांदे आणि बटाटे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसले तरी त्यांचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्व जरासं कमी झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच या वस्तूंचे भाव वाढले की महागाईबरोबरच तो राजकीय मुद्दा बनतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का? महाराष्ट्रात महिन्याला थोडेथोडके नव्हे तर एक लाख टन कांदे खाल्ले जातात, तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. कांदा, बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे.महाराष्ट्रात मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो.

५००० वर्षांपासून कांदा शेतीपृथ्वीवर ५ हजार वर्षांपासून कांदा शेती होते. उत्तर पश्चिम भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या डोंगराळ भागात कांद्याच्या उत्पादनास सर्वात आधी सुरुवात झाली. मध्य आशियातील डोंगराळ भाग हे कांद्याचे उत्पत्ती स्थान मानले जाते. 

केवळ ५ टक्के बटाट्याचे उत्पादनमहाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो. गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात. 

औषधी गुणधर्म कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे. हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. 

भारतात कांदा वापरविभाग       महिना (व्यक्ती/किलो)ग्रामीण       ०.८४२ शहरी         ०.९५१ 

नाशिकची दादागिरी भारतात वर्षभरात दोन ते तीन वेळा कांदा उत्पादन घेतले जाते.कांदा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.देशातील १७%  उत्पादन नाशिक विभागात आणि  १०%  उत्पादन  नाशिक जिल्ह्यात होते.महाराष्ट्रात देशातील कांदा उत्पादन होते. सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा आदी जिल्हे कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.विदर्भ व मराठवाड्यात कांदा उत्पादनात वाढ होत आहे. महाराष्ट्रात महिन्याला एक लाख टन कांदे आणि साधारणपणे ६०,००० टन बटाट्यांची मागणी

आपल्या शहरात दररोज किती कांदे, बटाटे खातात? शहर     कांदे (टन)     बटाटे (टन) मुंबई एमएमआर      १,०००              १,००० पुणे     ५००     ४००कोल्हापूर     १२०     ४० नागपूर     ३५०     ४०० औरंगाबाद     १००     ८०नाशिक     २००     ६० जळगाव    १५०     २५ सोलापूर     १०५     १०अकोला     ६०     १०अहमदनगर     ५०     १०महिन्याला एक व्यक्ती साधारण दीड किलो कांदा आणि ८०० ते ९०० ग्रॅम बटाटे खाते. खाद्यसंस्कृती आणि सामाजिक- आर्थिक स्थितीनुसार यात तफावत आहे. 

 

टॅग्स :foodअन्नMaharashtraमहाराष्ट्र