शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आनंद, नॉर्मल जीवनातला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 09:09 IST

ललित : सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती.

- सुषमा सांगळे - वनवे

शनिवार सकाळची शाळा असल्यामुळे खूप घाईघाईने आवरून ठीक ६:३० वाजताच मी गाडीत बसले. गाडीत बसल्याक्षणी अंगातून खूप घाम येऊ लागला होता. मुलांचे डबे, ह्यांचा डबा, घरातील सर्व काम आवरून मी शाळेत निघाले होते. खरं म्हणजे माझ्यासारखीच गाडीतील इतर शिक्षिकांचीही परिस्थिती होती. प्रत्येकाचा कुरकुरीचा सूर होता. प्राप्त परिस्थितीवर तसे कोणीही खुश नव्हते. तसे पाहता सर्व गोष्टी सर्वांच्या नॉर्मल होत्या. मी गाडीची काच हळूच वर केली.

सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती. विस्तीर्ण असलेला हायवे मनाच्या कक्षा रुंदावत होता. वनवे ट्रॅकवरून जाणारी आमची गाडी विचारांची दिशा ठरवत होती. रस्त्याच्या बाजूला असलेली गुलाबी, पिवळी फुलझाडे रस्त्याच्या सौंदर्यात भर घालून मोठ्या दिमाखाने  डोलत होती. सर्व गोष्टी तशा रोजच्याच होत्या, पण आजपर्यंत त्या सर्व नॉर्मल गोष्टीकडे माझे लक्ष का गेले नसावे?

खरं म्हणजे या सर्व नॉर्मल गोष्टी एवढ्या सुंदर असूनही आपले त्याकडे मुळीच लक्ष नसते किंवा ते पाहण्याची आपली तयारीही नसते. कारण त्यांना आपण एवढे गृहीत धरलेले असते की त्यांच्यातील आनंद, सौंदर्यच पाहण्याची दृष्टी आपण आपल्या रोजच्या रडगाण्यात विसरून गेलेलो असतो.‘कसे आहात?’ किंवा ‘कसे चालले आहे?’ असा प्रश्न जरी कोणी आपणास विचारला तर आपण ‘ठीक चाललेय’ अशा पद्धतीचे निरुत्साही उत्तर देऊन रिकामे होतो. खरं म्हणजे ‘मस्त आहे’ किंवा ‘मजेत चाललंय’ म्हणायला या लोकांना काय प्रॉब्लेम असतो. जोपर्यंत नॉर्मल गोष्टी या अ‍ॅब्नॉर्मल होत नाहीत तोपर्यंत आपणास त्या नॉर्मल गोष्टीचे महत्त्व पटलेले नसते.

साधे उदाहरण म्हणजे रोजचा प्रवासच बघा. आपण रोज प्रवास करीत असतो, पण त्यातील आनंद हा आपणाला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत काहीतरी आपल्याला विपरीत घडत नाही. एखाद्याचे असणे आपण अगदी गृहीत धरून चालतो, पण त्याच्या असण्याचा आनंद मात्र आपणास घेता येत नाही. परंतु तेच असणे जेव्हा नसण्यात जमा होते, तेव्हा मात्र त्या व्यक्तीची कमतरता, त्याची आठवण आपल्याला सतावून सोडते. थोडक्यात काय तर रोजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस आनंद ही भरभरून मिळणारी गोष्ट असूनसुद्धा तिच्या शोधात इतरत्र भटकत चालला आहे.

आपल्याभोवती दररोजच्या जीवनात तशा कितीतरी गोष्टी खूप चांगल्या घडत असतात. आपण आरोग्यसंपन्न जीवन जगत असतो. आपल्याला शरीराकडून कोणताही त्रास होत नसतो. पण याचे महत्त्व हे आपणास तेव्हाच समजू लागते, जेव्हा आपण कोणत्या तरी व्याधीने त्रस्त होतो अन् आपल्याला खाण्यापिण्यापासून प्रत्येक कृतीवर बंधनं लादली जातात.

आपण नॉर्मल आहोत, अ‍ॅब्नॉर्मल नाही. त्यासाठी कृतज्ञता बाळगायला हवी. एक सामान्य माणूस जो देहदिव्य आहे, त्याला प्रत्येक अवयव आहे. जगाच्या पाठीवर अशी अनेक लोकं आहेत, ज्यांनी सामान्य जीवन हे कधीच अनुभवलेले नाही. असे अनेक लोक आहेत, ज्यांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. कित्येकांच्या माथ्यावर छप्परदेखील नाही, अशाही महिला आहेत ज्या सुरक्षित जीवन जगू शकत नाही. कित्येकांना खूप सारे वैभव सुख असून झोपदेखील येत नाही. कधी कधी सामान्य आयुष्य जगणारे हे खूप भाग्यवान असतात. फक्त त्यांना आपल्या चांगल्या भाग्याची जाणीव होत नाही तर काहींना खूप उशीर होतो.

उगवतीचा सूर्य सुंदर आहे. तसाच मावळतीचाही सुरेख आहे. त्याच्या रंगाच्या विविध छटांनी आभाळात रंग भरतात आणि सारे आसमंत रंगात न्हाऊन जाते. संध्यासमयीच्या क्षितिजाच्या निळ्याशार रेषा किती कळत-नकळत अंधाराची चादर ओढून शांत निघून जातात. विस्तीर्ण रस्त्यावरील विजेच्या दिव्यांचेही सौंदर्य  काही कमी नसते. सृष्टीतील या नॉर्मल गोष्टीतसुद्धा केवढा आनंद लपलेला आहे. फक्त आपण तो उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतो. जेव्हा आपण आपल्याकडे असणाऱ्या गोष्टीची कदर करतो तेव्हाच आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी येतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNatureनिसर्ग