शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठकीतच जलसाठ्याची चुकीची माहिती होते सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 07:00 IST

तब्बल २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची आॅनलाईन माहितीच  अद्ययावत केली जात नसल्याने, चक्क मंत्री मंडळाच्या बैठकीतच चुकीची माहिती सादर केली जात आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना पत्र धरणसाठ्याची माहितीच अद्ययावत केली जात नाही

विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. त्यातच पाण्याच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या जलसंपदा विभागामध्ये काम करणाऱ्यांचा दुष्काळ पडला आहे. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा तब्बल २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची आॅनलाईन माहितीच  अद्ययावत केली जात नसल्याने, चक्क मंत्री मंडळाच्या बैठकीतच चुकीची माहिती सादर केली जात आहे. त्यामुळे जलनियोजनचा निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील अमरावती, कोकण, नागपूर, पुणे अणि मराठवाड्यात ३ हजार २६७ लहान, मोठे आणि मध्यम धरण प्रकल्प आहेत. त्यातील मोठ्या प्रकल्पांची संख्या १४१ असून, मध्यम प्रकल्पांची संख्या २५८ इतकी अहे. तर, लहान प्रकल्प २ हजार ८६८ इतके आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर राज्यातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार वर्षभराचे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते. त्या नुसार पिण्यासाठी, शेती आणि उद्योगांसाठी किती पाणी द्यायचे याचा निर्णय होतो. त्यामुळे राज्यातील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती असणे गरजेचे असते. राज्यातील धरणसाठ्यांची माहिती मिळविणे गतीमान व्हावे यासाठी राज्यसरकारने प्रवाह अ‍ॅप तयार केला आहे. त्या माध्यमातून प्रत्येक धरण प्रकल्पनिहाय धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारी प्राधिकृत केला आहे. संबंधित प्राधिकृत अधिकाºयाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ती विश्लेषणासहित अद्यावत होत असते. दुष्काळाच्या काळात देखील या प्रणालीचा उपयोग होताना दिसत नाही. संबंधित अधिकारी अश्ी माहिती अद्ययावत करत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर खुद्द जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्यांसाठी पत्रक काढले आहे. त्यात या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाचे निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकांमध्ये धरण पाणीसाठ्याची माहिती देण्यात येते. ही माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक असते. तरी देखील मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पांची माहिती अद्ययावत करण्यात येत नाही. त्यामुळे चुकीची माहिती सादर होते. ही माहिती अद्यावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्या प्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, अशा कडक शब्दात पत्रात कानउघडणी करण्यात आली आहे. जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी देखील पाणीसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने चुकीच्या माहितेचे सादरीकरण होत असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीGovernmentसरकारDamधरण