शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

मंत्रिमंडळ बैठकीतच जलसाठ्याची चुकीची माहिती होते सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 07:00 IST

तब्बल २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची आॅनलाईन माहितीच  अद्ययावत केली जात नसल्याने, चक्क मंत्री मंडळाच्या बैठकीतच चुकीची माहिती सादर केली जात आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांना पत्र धरणसाठ्याची माहितीच अद्ययावत केली जात नाही

विशाल शिर्के पुणे : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे राज्य दुष्काळाला सामोरे जात असून, पाण्याच्या नियोजनावरच पुढील आठ महिने काढावे लागणार आहेत. त्यातच पाण्याच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या जलसंपदा विभागामध्ये काम करणाऱ्यांचा दुष्काळ पडला आहे. राज्यातील ४६ मोठ्या आणि १६० मध्यम अशा तब्बल २०६ प्रकल्पांची ३५ दिवसांच्या धरणसाठ्याची आॅनलाईन माहितीच  अद्ययावत केली जात नसल्याने, चक्क मंत्री मंडळाच्या बैठकीतच चुकीची माहिती सादर केली जात आहे. त्यामुळे जलनियोजनचा निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. राज्यातील अमरावती, कोकण, नागपूर, पुणे अणि मराठवाड्यात ३ हजार २६७ लहान, मोठे आणि मध्यम धरण प्रकल्प आहेत. त्यातील मोठ्या प्रकल्पांची संख्या १४१ असून, मध्यम प्रकल्पांची संख्या २५८ इतकी अहे. तर, लहान प्रकल्प २ हजार ८६८ इतके आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर राज्यातील उपलब्ध पाणी साठ्यानुसार वर्षभराचे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते. त्या नुसार पिण्यासाठी, शेती आणि उद्योगांसाठी किती पाणी द्यायचे याचा निर्णय होतो. त्यामुळे राज्यातील पाणीसाठ्याची अद्ययावत माहिती असणे गरजेचे असते. राज्यातील धरणसाठ्यांची माहिती मिळविणे गतीमान व्हावे यासाठी राज्यसरकारने प्रवाह अ‍ॅप तयार केला आहे. त्या माध्यमातून प्रत्येक धरण प्रकल्पनिहाय धरणसाठ्यांची माहिती भरण्यासाठी एक अधिकारी प्राधिकृत केला आहे. संबंधित प्राधिकृत अधिकाºयाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ही माहिती भरल्यास राज्य सरकारच्या संकेतस्थळावर ती विश्लेषणासहित अद्यावत होत असते. दुष्काळाच्या काळात देखील या प्रणालीचा उपयोग होताना दिसत नाही. संबंधित अधिकारी अश्ी माहिती अद्ययावत करत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर खुद्द जलसंपदा विभागाने सर्व मुख्य अभियंत्यांसाठी पत्रक काढले आहे. त्यात या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळाचे निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकांमध्ये धरण पाणीसाठ्याची माहिती देण्यात येते. ही माहिती दररोज अद्ययावत करणे आवश्यक असते. तरी देखील मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पांची माहिती अद्ययावत करण्यात येत नाही. त्यामुळे चुकीची माहिती सादर होते. ही माहिती अद्यावत न केल्यास सरकारची दिशाभूल केल्या प्रकरणी संबंधितास जबाबदार धरण्यात येईल, अशा कडक शब्दात पत्रात कानउघडणी करण्यात आली आहे. जलसंपदा ई प्रशासन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी देखील पाणीसाठ्याची माहिती अद्ययावत न केल्याने चुकीच्या माहितेचे सादरीकरण होत असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीGovernmentसरकारDamधरण