शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

जागतिक ताण-तणाव दिन विशेष : मनाचा त्रिकोण सांभाळा, मनोविकारापासून दूर राहा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:34 IST

विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो.

ठळक मुद्दे मानसोपचार तज्ज्ञाचे आवाहन 

अतुल चिंचली       पुणे : मन म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. शास्त्रीय दृष्टीने मनाच्या अनेक व्याख्या होतात. मेंदू विज्ञान मनाचा विचार वेगळ्या पद्धतीने करतात. पहिल्या पातळीत विचार, भावना आणि वर्तन यांचा समभुज त्रिकोण असतो. तिघांमध्ये संवाद असेल तर समतोल राखला जातो. हे एकमेकांशी भांडत नाहीत त्याला मानसिक आरोग्य म्हणतात. आपल्या आयुष्यात सतत ओढाताण चालू असते. विचार आणि  भावना वेगवेगळ्या दिशेने जात असतात. त्या दोघांच्या जाळ्यात वर्तन अडकते. विचार, भावना आणि वर्तन ताणले गेले की तणाव निर्माण होतो. त्रिकोण फाटला की मानवाला मनोविकार होतात. त्यामुळे हा त्रिकोण सांभाळा असे आवाहन ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांनी केले.          मानसिक आरोग्याची पहिली पातळी म्हणजे या तिघांमध्ये सुसंवाद हवा. या त्रिकोणात शरीर सहभागी झाले की त्याचे पिरॅमिड तयार होते. पुढच्या पातळीत शरीर आणि मनाच्या सुसंवादाला आरोग्य असे म्हणतो. आपले आवडते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शारीरिक कष्ट घेतो. ते उद्दिष्ट पूर्ण होते. पण आपल्याला थकल्यासारखे वाटत नाही. पण कामाचा आनंद मिळतो. येथे तणाव घेत नाही.मनाला समाधान मिळते. कामाची इच्छा नसताना काम केले, की शरीर मात्र कष्ट करते पण मन समाधानी होत नाही. हे काम आपण तणाव घेऊन केलेले असते.  त्यासाठी शरीर आणि मनाचा सुसंवाद महत्वाचा असतो. तिसऱ्या पातळीत पिरॅमिड स्थितीशील असल्याने त्याचे रूपांतर गतिशील अवस्थेत करण्यासाठी त्रिकोणाचे रूपांतर गणिती कोनात होते. विचार, भावना वर्तन यांना शरीराची ऊर्जा मिळाली की एक वर्तुळ तयार होते. या वतुर्ळात मनाची ऊर्जा तयार होते. 

१. विचार, भावना वर्तन यांचा सुसंवाद, २. मन शरीर यांचा सुसंवाद, ३. मनाची ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा यांचा सुसंवाद या तीन पातळया आहेत. 

विचार, भावना आणि वर्तन यांचा विस्तार कसा होतो.आपले विचार आत्मकेंद्रित न राहता समूह केंद्रित झाले की विचारांचा विस्तार होतो. आपल्या भावना समजून दुसऱ्यांच्या भावना समजण्याचा प्रयन्त केला की भावनांचा विस्तार होतो.  जसे कौशल्य वाढते तसे वर्तन विस्तारत जाते. कौशल्यामुळे वर्तनात, ज्ञानामुळे विचारात, अनुभवामुळे भावनामध्ये विस्तार होत जाणे. यालाच शिक्षण असे म्हणतात. ही प्रगतभावना आहेत. विचार, भावना आणि वर्तन सुसंवादाचा यांचा विस्तार झाला की आपल्या तणाव कमी होतो. या मानसशास्त्रमध्ये संतत्व येते. आपली आवड आणि दुसऱ्यांची आवड एकरूप झाली. या क्षणाला संतत्व असे म्हणतात.संतत्वाचा प्रत्येक क्षण मानवी जीवनाचा एक भाग असतो. या क्षणात आपला मी पणा विरघळतो. त्याचे दुसरे सूत्र म्हणजे स्वीकार असते. विचाराने ज्ञानमार्ग, भावनेने भक्तिमार्ग, आणि वर्तनाने कर्ममार्ग असे मार्ग संतत्वमध्ये येतात. विचार, भावना आणि वर्तन या तिघांमध्ये ऐक्य निर्माण झाले की संतत्व येते.      विचार आणि भावना यांची उत्क्रांती कशी झाली. आदिमानवाच्या काळात त्याच्यावर वन्य प्राणी हल्ला, त्सुनामी, वणवा, पूर, अशा नैसर्गिक आपत्ती येत असे. अशा वेळी त्याला तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते. आदिमानवाकडे लढा, पळा, लपून रहा असे तीन पर्याय होते. तो या पयार्यांचा वापर करू लागला. तेव्हाच स्वायत्त मज्जासंस्थेची स्थापना झाली. लढण्याबरोबर संताप, पळण्याबरोबर भीती, लपून राहण्याबरोबर नैराश्य आणि एकटेपणा या भावनांची निर्मिती झाली. यांना आपण आदिमभावना म्हणतो. सर्व काही निर्णय चुकले की जी भावना तयार होते. तिला खंत असे म्हणतात. आदिमानवाच्या काळापासून आदिमभावना मानवामध्ये रुजू झाल्या आहेत. आदिमभावनामध्ये स्वत:चा विचार केला जातो. प्रगतभावनामध्ये दुसऱ्याचा विचार केला जातो. सध्याच्या परिस्थितीत आपली बौद्धिक, तांत्रिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्व आव्हाने वाढत आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदिमभावनेबरोबरच प्रगतभावनेचा विचार केला पाहिजे. समोरच्या आव्हानांचा विचार करून डोकं चालवले तर संताप कमी होईल. संताप कमी झाला की माणूस तणावापासून दूर राहतो.                                                                                              

टॅग्स :PuneपुणेMeditationसाधनाHealthआरोग्य