शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

पाण्याच्या खेपा करून ग्रामीणमधील महिलांचे आरोग्य धोक्यात : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 8:32 PM

मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा दुष्काळी दौरा- चारा छावण्यांसह दुष्काळी गावांना दिली चित्रा वाघ यांनी भेटी- पाहणी करताना शेतकºयांच्या व महिलांच्या समस्या घेतल्या जाणून

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत महिला आणि मुलांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

चित्रा वाघ यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की,  ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. डोक्यावर आणि कमरेवर पाण्याच्या घागरी, हंडे वाहिल्याने ग्रामीण भागातील महिलांना गर्भपात, कमरेच्या विकारासह अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. अनेक छावण्यांवर महिलांना मुक्काम करावा लागत आहे. त्यांच्या मागे मुलांची हेळसांड होत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने बालगृहे सुरू करायला हवीत. महिलांसाठी शाश्वत रोजगार हमी योजना सुरू करायला हवी. ५० वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामस्थांसाठी अनुदान द्यायला हवे. 

अनेक महिलांनी शेळ्या, मेंढ्या यांच्या चाºयासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दुष्काळाच्या काळात लोक वैतागलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी या सर्व मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, निर्मला बावीकर, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होत्या. 

जनावरांना, माणसांना एकसारखे पाणीचित्रा वाघ यांनी छावण्यांमधील विदारक परिस्थिती कथन केली. छावण्यांवर जनावरांसाठी उपलब्ध असलेले पाणी माणसांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. जनावरांना उसाचा चारा दिला जातोय. एकच प्रकारचा चारा खाऊन जनावरांच्या तोंडाला फेस येतोय. घरदार सोडून लोक जनावरांसाठी छावण्यांवर आले आहेत. सरकारने केवळ पाच जनावरांना चारा मिळेल, अशी अट घातली आहे. त्याचाही त्रास अनेक शेतकºयांना होतोय. मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळChitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाHealthआरोग्य