शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांनी उत्तरेतील थंडी रोखली; राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 8:33 PM

उत्तर भारत, मध्य प्रदेश, कच्छमध्ये थंडीची लाट..

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील अनेक ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस३१ डिसेंबर रोजी कोकण,गोव्यात तरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : उत्तर भारत, मध्य प्रदेश, राजस्थान, कच्छ या परिसरात थंडीची लाट आली असताना महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुताश भागातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे. याला कारण प्रामुख्याने देशात सध्या दिसून येत आलेले ॲन्टी सायक्लोनमुळे उत्तर ऐवजी पूर्वेकडून येणारे वारे होय.

सध्या राज्यात बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे आंध्र प्रदेश, तेलंगणा मार्गे राज्यात येत आहे. त्यामुळे उत्तरेकडील वारे मध्य प्रदेशपर्यंतच रोखले गेले आहे. त्याचा परिणाम मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेली आहे. त्याचवेळी लगतच्या विदर्भातील किमान तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तसेच गुजरात, कच्छ, राजस्थान परिसरात उत्तरेकडील वारे येत असल्याने तेथील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. अबु येथे उणे ४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली घसरले आहे.

याबाबत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, उत्तरेकडून थंड वारे दक्षिणेकडे येत असेल तर त्या राज्यात कडाक्याची थंडी येते. सध्या पूर्वेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे वाटेत अडविले जात आहे. थंड वार्यांबरोबरच सूर्याची उष्णता आणि परिसरातील हिरवे आच्छादन याचाही परिणाम तापमानावर होत असतो. उत्तरेकडील थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नसल्याने त्याचा परिणाम राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत नाही. त्यामुळे सध्या उबदार वातावरण राज्यातील बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ही स्थिती अजून ४ ते ५ दिवस राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. मराठवाड्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे.

३१ डिसेंबर रोजी कोकण,गोव्यात तरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन