शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र गृहमंत्र्यासाठी आग्रही असणारे उद्धव ठाकरे गृहखाते नाकारतील का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:46 IST

स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात असे झाल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सांभाळू शकतात का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवे अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनीचं केली होती.

मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडण्यासाठी सत्तेत असेलल्या पक्षातील नेत्यांकडून रस्सीखेच होत असल्याचे आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र गेल्यावेळीच्या सरकारमध्ये आत्ताचे असलेले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच गृहखाते सुद्धा स्वता:कडेच ठेवेले होते. तर आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा गृहखाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. तर शरद पवार आणि ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय सुद्धा झाला असल्याची माहिती आहे.

मात्र मवाळ स्वभाव असलेले उद्धव ठाकरे हे काटेरी मुकुट समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री पद सांभाळू शकतात का ?असा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे. हे पद सांभाळताना अनकेदा कठोर भूमिका घ्यावी लागते. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहखाते स्वतंत्र असायला पाहिजे अशी मागणी अनकेदा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावेळीच्या सरकारमध्ये असलेल्या उद्धव ठाकरेंनी अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे राज्यातील विकासकामांमध्ये खूप व्यस्त असतात, तर विकास करताना सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे राज्यात गृहखात्याला पूर्णवेळ देणारा गृहमंत्री देण्यात यावा अशी मागणी केली होती. परंतु आता स्वता: केलेली मागणी उद्धव ठाकरे पूर्ण करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गृहखाते म्हणजे काटेरी मुकुट

राज्यातील मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपद सर्वात महत्वाचे समजले जाते. कारण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जवाबदारी याच खात्याच्या मंत्र्यांकडे असते. आत्तापर्यंत राज्याने अनेक गृहमंत्री पहिले आहेत. मात्र त्यांना सुद्धा या पदावर असताना अनेक अडचणी व आरोपांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची छोटीशी चूक सुद्धा विरोधकांसाठी आरोपाचा मुद्दा ठरतो. उत्कृष्ट असे गृहमंत्री समजल्या जाणाऱ्यांपैकी एक असलेले आर.आर.पाटील यांनासुद्धा 26/11 च्या हल्ल्यानंतर आपल्या एका वक्तव्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे काटेरी मुकुट समजल्या जाणारे गृहखाते उद्धव ठाकरे हे सांभाळतील का ? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.