शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस येणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:51 AM

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मुंबई - 2014 मध्ये शिवसेनेला मागच्या दाराने सत्तेत सामील करून घेतल्यानंतर भाजपने नेहमीच दुय्यम वागणूक दिली. तसेच आपल्या पक्ष विस्तारासाठी शिवसेनेचे अनेक ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं हे समिकरण असणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीपासून दंड थोपटले होते. तर शिवसेनेने भाजपसोबत युती करणे पसंत केले. परंतु, उभय पक्षातून युती केल्यानंतरही एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बंडखोरांना बळ दिले होते. यामध्ये भाजपचे 83 तर शिवसेनेचे 65 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन कऱण्याचा डाव भाजपचा होता. परंतु, हा डाव आता त्यांच्यावर फिरताना दिसत आहे.

दरम्यान भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयारी लावली आहे. 2014 मध्ये ज्या प्रमाणे शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते. आता काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.  

राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनीही असंच काहीस सांगितलं आहे. त्यांनी इशाऱ्यातून शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा सेनेला दुय्यम वागणूक दिल्यास शिवसेनेसाठी महाआघाडीसोबत जावून सत्ता स्थापन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.