शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

President's Rule : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास 'हे' हाेतील परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 4:54 PM

Indian Election : काेणीही सरकार स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. असे झाल्यास राज्यावर काय परिणाम हाेतील याचा घेतलेला आढावा.

पुणे : भाजप आणि शिवसेना या दाेन पक्षांमध्ये सत्तासंधर्ष सुरु असल्याने राज्यात अद्याप काेणाचेच सरकार स्थापन हाेऊ शकलेले नाही. आज 2014 च्या विधानभा विसर्जित हाेत आहे. येत्या काळात काेणीच सत्तास्थापनेचा दावा न केल्यास राज्यघटनेनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकते. जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याचे काय परिणाम हाेतील, राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल याबाबत घटनातज्ञ डाॅ. उल्हास बापट यांच्याशी साधलेला संवाद 

डाॅ. उल्हास बापट म्हणाले, 172 कलमांतर्गत विधानसभा निर्माण झाल्याच्या पाच वर्षानंतर कायद्यानुसार विसर्जित हाेेते. राज्यपालांना ती विसर्जित करावी लागत नाही. विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू शकत नाहीत. राज्यपाल जाे मुख्यमंंत्री नियुक्त करतील ताे नवीन विधानसभेला जबाबदार असेल. नवीन विधानसभा राज्यपालांना बाेलवावी लागेल. त्यानंतर तात्पुरता अध्यक्ष नेमला जाईल. ताे सर्वांना शपथ देईल. त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त हाेताे. मतदानानंतर अध्यक्षाची निवड सदस्य करतील आणि जर मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव असेल तर ताे सदस्य संमत करतील, अशी संविधानिक प्रक्रीया आहे. 

जर काेणीच सत्तास्थापनेचा दावा केला नाहीतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात. त्यानंतर राष्ट्रपती 356 कलमानुसार त्या राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करतात. या सर्व आणिबाणीच्या तरतूदी आहेत. राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणबाणी लागू हाेते, 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेच्या कार्याचे अधिकार संसदेकडे जातात. उच्च न्यायालयावर कुठलाही परिणाम हाेत नाही. दाेन महिन्याच्या आत याला संसदेची संमती लागते. 6 महिन्यापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते. सहा महिन्यांहून अधिक काळ राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास निवडणूक आयाेगाची संमती लागते. ही राष्ट्रपती राजवट पुढे तीन वर्षे लागू केली जाऊ शकते. तीन वर्षाच्या पुढे ती ठेवता येत नाही. 

राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ राज्याची सर्व सत्ता ही राज्यपालांच्या हाती जाते. याचाच अर्थ मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवितात. नवीन मुख्यीमंत्री नेमेपर्यंत ही राष्ट्रपती राजवट सुरु राहते. राष्ट्रपती राजवट कधीही मागे घेतली जाऊ शकते. राज्यपालांना या काळात धाेरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. दरराेजचा राज्यकारभार त्यांना चालविता येताे. राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्याचं बजेट संसद पास करु शकते. परंतु प्रत्यक्ष मुख्यंमत्र्यांना असणारे अधिकार प्रत्यक्ष राज्यपालांना वापरता येत नाहीत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPresidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019