शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अख्ख्या गावाचा गहू आगीत खाक !

By admin | Updated: March 21, 2017 23:17 IST

आरल गावात निराशा : पंधरा लाखांचे नुकसान; ६१ शेतकऱ्यांना फटका, मळणीसाठी एकत्र केलेला गहू भस्मसात

मणदुरे : पाटण तालुक्याच्या चाफोली विभागातील पुनर्वसित आरल गावात अचानक लागलेल्या आगीत शेतात कापून ठेवलेला ६१ शेतकऱ्यांचा गहू जळून खाक झाला. तसेच शेतातील गवताच्या गंजी, शेणखत, जळावू लाकडेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरणातून पुनर्वसित झालेले आरल गाव चाफोली विभागात आहे. या गावात ६१ कुटुंबे आहेत. गावच्या शिवारातील गहू एकत्र गोळा करून आरल येथील भैरी-केदार मंदिराशेजारी मोकळ्या जागेत सर्व कुटुंबांचा गहू मळणीसाठी एकत्र करून ठेवला होता. एकत्र केलेला गहू मळणी यंत्राने मळायचा होता. दोन दिवसांत या ठिकाणी मळणी यंत्र येणार होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, मंगळवारी दुपारी अचानक आग लागून सर्व गहू जळून खाक झाला. गावकामगार तलाठी पी. पी. शिर्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, सत्यजितसिंंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, माजी पंचायत समिती सदस्या शोभा कदम, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव, राजेश पवार, नवनाथ कदम, माजी सरपंच विजय शिंंदे, हरीभाऊ सूर्यवंशी, सुभाष पवार, नथुराम झोरे, रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.या आगीत श्रीपती पवार, काशिनाथ पवार, अशोक पवार, रामचंद्र पवार, मारुती पवार, गोविंंद धुमाळ, तानाजी पवार, बाबूराव पवार, सीताराम पवार, किसन पवार, निवृत्ती पवार, बनाबाई पवार, नारायण पवार, रामचंद्र पवार, अर्जुन पवार, वैजंता पवार, कलाबाई पवार, सीताराम पवार, राजाराम पवार, पांडुरंग पवार, वसंत पवार, लक्ष्मी पवार, लक्ष्मण पवार, पाराबाई पवार, ज्ञानू पवार, तुकाराम पवार, मोहन पवार, आनंदा पवार, जगन्नाथ पवार, बाळाबाई पवार, चंद्रकांत कदम, गोविंंद कदम, विलास कदम, बबाबाई कदम, संगीता कदम, बंडू कदम, निवृत्ती पवार, शिवाजी पवार, रामचंद्र सपकाळ, तानाजी सपकाळ, पांडुरंग पवार, शंकर कदम, रामचंद्र कदम, चंद्रकांत सपकाळ, भागुजी सपकाळ, प्रकाश सपकाळ, पांडुरंग कदम, बंडू कदम, श्रीरंग पवार, विठ्ठल यादव, अशोक कदम, अंकुश कदम, विश्वास कदम, विश्वनाथ पवार, पांडुरंग पवार, धोंडिराम पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)जीप चालकाचे प्रसंगावधानआरल मार्गावरून मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक जीप जात होती. त्यावेळी गव्हाला आग लागल्याचे जीप चालकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर या चालकाने प्रसंगावधान राखत ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. ग्रामस्थांनी तातडीने फोन करून पाटण येथील अग्निशामक पथकास पाचारण केले. अग्निशामक पथक आल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत गहू, गवताच्या गंजी, जळावू लाकडे, शेणी, शेणखत असे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.