शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पीकविमा योजनेचा खेळखंडोबा कुणी केला? शेतकऱ्यांना दुषणे दिली, सरकारने पळ काढला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:34 IST

एक रुपयात पीकविमा योजनेचा ज्यांनी गैरफायदा घेतला, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु केवळ गैरव्यवहार झाल्यामुळे योजनेतील महत्त्वाची तरतूद बंद करणे योग्य नाही. 

- केदार देशमुख वरिष्ठ संशोधक, युनिक फाउंडेशन, पुणे

हाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन २०२३ मध्ये बिहारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीकविमा  योजन सुरू केली. यामुळे पीकविमा भरणाऱ्या अर्जांची संख्या ९६ लाखांवरून १.७० कोटींवर गेली. ७४ लाखांनी अर्जदारांची संख्या वाढली आणि शासनालादेखील हेच अपेक्षित होते. २०२३ सालच्या खरीप हंगामात पिकांचे झालेले नुकसान यापेक्षा होणाऱ्या निवडणुकीमुळे विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मागील वर्षाच्या (खरीप २०२२) तुलनेत अधिक दिली.

निवडणुका होताच शासनाने आपल्या निर्णयापासून पळ काढला आहे आणि एक रुपयाची पीकविमा योजना बंद केली. खरीप हंगाम २०१६ पासून ते रब्बी २०२२च्या हंगामापर्यंत राज्यातील शेतकरी स्वत:चा २ टक्के हिस्सा (नगदी पीक असेल तर ५ टक्के) भरून पीकविमा भरत होता. 

एक रुपयाची योजना बंद करताना शेतकऱ्यांना दुषणे दिली. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्यांच्यावर कारवाईची भूमिका खुद्द शेतकऱ्यांनी व त्यांच्या संघटनांनी घेतली आहे. केवळ गैरव्यवहार झाल्यामुळे योजनेतील महत्त्वाची तरतूद बंद करणे योग्य नाही. याच बरोबर गेल्या ८ वर्षांत शेतकरी, राज्य आणि केंद्र शासनाच्या विमा हप्त्यावर अनेक विमा कंपन्यांना आर्थिक लाभ झाला आहे. गेल्या तीन वर्षांतील विमा हप्ता आणि दिलेली नुकसानभरपाईची आकडेवारी पाहता विमा कंपन्यांचा फायदा स्पष्ट दिसतो. यामुळेच योजनेच्या सोशल ऑडिटची गरज आहे. 

आता योजनेत काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यानुसार पीकविमा योजनेत नुकसानभरपाईच्या ज्या पद्धती केंद्राने ठरवल्या आहेत, त्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार, काढणी पश्चात नुकसानभरपाई या पद्धती वगळण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे जे अतोनात नुकसान होत आहे त्यास भरपाई मिळावी म्हणून विमा कंपन्यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले होते, त्यांच्या विरोधात जिल्हा पातळीवर लढे उभारले जात होते. पण वरील नुकसानीच्या पद्धती वगळल्यामुळे शेतकऱ्यांनी आता कोणाकडे दाद मागायची, हा कळीचा मुद्दा आहे. नव्या बदलांमध्ये केवळ पीक कापणी अहवालाच्या आधारे अर्थात सरासरी प्रतिउंबरठा उत्पन्नानुसार भरपाई देण्याची पद्धत अवलंबली आहे. पीक कापणी अहवाल एका महसूल मंडळात एका पिकाचे ३ ते ४ करणे अपेक्षित असते, पण हे अहवाल शास्त्रीय पद्धतीनुसार केले जात नाहीत. पीक कापणी अहवालात काही दोष आहेत.

दुसरे म्हणजे राज्यात सर्वाधिक पीकविमा काढणारे शेतकरी मराठवाडा आणि विदर्भातील (पश्चिम) आहेत. या विभागातील अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, दोन पावसातील खंड यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असणारे सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान होते. या भागातील या पिकांचे सरासरी उत्पन्न कायमच कमी असल्यामुळे सरासरी उंबरठा पद्धत या प्रदेशांसाठी कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे शासनाने छोट्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या दिशेने गंभीर धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. विशेषत: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी गंभीर धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहेत. मध्यंतरी शासनाने पीकविम्याचे बीड मॉडेल अंमलात आणले होते; पण त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे ते मॉडेल फसले. त्याची पुन्हा एकदा कडक अंमलबजावणी केली तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची अधिक भरपाई मिळण्याची हमी मिळण्याची शक्यता आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी व राज्य आपत्ती निवारण निधीतून तातडीने मदत करण्याची हमी राज्य शासनाने घ्यावी.

टॅग्स :Farmerशेतकरी