शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

देशात सहा तर महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडण्यास कोण जबाबदार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 18:59 IST

काँग्रेसला भाजपप्रमाणे मार्केटिंगची गरज..

ठळक मुद्देआमदार अनंत गाडगीळ  यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल  तिकीट वाटपाच्या वेळी कुठे विचारात घेतले...

पुणे  : देशातील बेकारी हटवून रोजगाराची स्वप्ने दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या आर्थिक मंदीबद्द्ल उत्तरे द्यावीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखोजण बेरोजगार झाले आहेत. अशावेळी अर्थमंत्री ओला आणि उबेरमुळे मंदी आल्याचे सांगतात. देशात सहा लाख तर महाराष् ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडल्या आहेत. तसेच राज्यातील 950 कारखान्यांना टाळे लागले आहेत. विविध उत्पादनाच्या शंभर शोरुम बंद पडले आहेत. यासगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत. असा सवाल आमदार अनंत गाडगीळ यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.  शनिवारी गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, पुण्यातील हिंजवडी खराडीतील आयटी कंपन्या करत तीन हजार कोटींचे उत्पन्न सॉफ्टवेअरव्दारे देते. आता त्याची आकडेवारी अठराशे कोटीवर आली आहे. याप्रकारच्या मंदीमुळे मोदींच्या गुजरात मध्ये हातमाग, डायमंड आदी क्षेत्रातील दीड लाख लोकांनी सुरतबाहेर स्थलांतर केले आहे. मोदी सरकार हे केवळ इव्हेंट मँनेजमेंट कंपनी झाली आहे. या सरकारने न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव आणला आहे. न्यायव्यवस्थेची परिस्थिती सांगायची झाल्यास आताच्या घडीला देशात 1हजार 79 न्यायधीशांची गरज असताना त्यापैकी केवळ 601 जणांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये पावणेतीन कोटी केसेस, उच्च न्यायालयात 40 लाख तर सर्वोच्च न्यायालयात 60 हजार केसेस प्रलंबित आहेत. यासगळयावर कुणीच बोलण्यास तयार नाही.  विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, भाजपला सडेतोड उत्तर देताना कॉग्रेसला त्यांच्याप्रमाणे माकेर्टींगची गरज आहे. तसेच आघाडीने निवडणूकांमधून ढिसाळ अर्थव्यवस्थेचा प्रश्न मांडावा, शासनाची निष्क्रीयता सर्वसामान्य मतदारांना समजावून सांगावी. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणा-या सरकारने काय केले? हे आता सांगण्याची वेळ आली आहे. प्रचारात या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे गाडगीळ म्हणाले. 

* तिकीट वाटपाच्या वेळी कुठे विचारात घेतले...विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान सर्वत्र तिकीट वाटपाची चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठांना त्यापासून लांब ठेवण्यात आले. यात माझाही समावेश होता. मलाही पक्षात काय चालले आहे? कुणाला तिकीट देण्यात आले आहे? याविषयी काहीही माहिती नव्हती. जे काही आहे ते सर्व अगोदर ठरलेले होते. उमेदवार निवडीबाबत एका ठिकाणी बैठक झाली. त्यात उमेदवाराच्या नावावर शिक्का मारण्यात आला. ज्येष्ठांना विचारत घेतले जात नसल्याची खंत गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केली. 

.................

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानAutomobileवाहनGovernmentसरकारcongressकाँग्रेस