शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 10:47 IST

शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही असा सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी विचारला आहे.

जळगाव - बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आम्हाला मोठे केले आहे. Who is Aaditya Thackeray? आम्ही गद्दार आहोत हे बोलण्याचा त्यांना काय अधिकार? गद्दारी तुम्ही केली. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याशी आघाडी केली. आम्ही तुमच्यामागे नतमस्तक होऊन गेलो. आम्ही तुमचं ऐकलं. परंतु आमदारांची कामे होत नव्हती. आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या. परंतु त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.  

जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या मतावर खासदार झाला. शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही. शिवसेना आमचीच आहे. आम्ही बाळासाहेबांना सोडलं नाही. आनंद दिघेंना सोडलं नाही. आम्ही पक्ष सोडला नाही. आमच्या खांद्यावर भगवा झेंडा. जो आमच्यासोबत राहील तो आमचा. जो येतो तो टीका करतोय. आयुष्यभर संघर्ष केलेल्या माणसांवर बोलतायेत असा समाचार त्यांनी टीकाकारांचा घेतला. 

तसेच परिणामांचा विचार करून राजकारण चालत नाही. संघर्ष जीवनाची यात्रा मानून वाटचाल करा. देव तुमच्या पाठिशी आहे. संघर्षाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. संघर्ष हे भविष्य आहे. कुणाला कुठल्याही पक्षाचं तिकीट दिलं तरी माणूस दर्जेदार लागतो. ५ लाख वाटून डिपॉझिट वाचवू शकत नाही. पक्षाचं योगदान निश्चित असते परंतु माणसालाही किंमत आहे असं सांगत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला टोला लगावला. 

३२ वर्षाचं पोरगं गोधडीत होतं, ते आमच्यावर टीका करतंयदरम्यान, ३५ वर्ष आम्ही काय केले सगळ्यांना माहिती आहे. कुणी झेंडा लावायला तयार नव्हतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे, तडीपारी भोगणारे, जेलमध्ये जाणारे आम्ही आहोत. ३०२ आमच्यावर आहेत. ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे गोधडीत होता तो आमच्यावर टीका करतोय. तुम्ही संपत्तीचे मालक होऊ शकता परंतु विचारांचे वारस होऊ शकत नाही. विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुमचं पक्षात योगदान काय आहे? उद्धव ठाकरेंचे चिरंजीव. उद्धव ठाकरेंना आमच्यावर बोलण्याचा १०० टक्के अधिकार परंतु आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. 

त्याचसोबत टीका करणाऱ्याला करू द्या, परंतु इतिहासात आमच्या उठावाची नोंद होईल. आम्ही सांगून निघालो. हे सरकार वाचू शकलं असतं. परंतु चहापेक्षा किटली गरम अशी संजय राऊतांची भाषा होती. ३५ वर्ष एकच झेंडा, एकच मैदान, हिंदुह्द्रयसम्राट म्हणणाऱ्या आमच्यासारख्यांना तुम्ही दोष देता, टीका करता लाज वाटली पाहिजे. कोण संजय राऊत, जो एका वार्डातून निवडून आला नाही असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे