शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Who is Aaditya Thackeray?, हे पोरगं गोधडीत होतं तेव्हा...; शिंदे गटाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 10:47 IST

शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही असा सवाल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी विचारला आहे.

जळगाव - बाळासाहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आम्हाला मोठे केले आहे. Who is Aaditya Thackeray? आम्ही गद्दार आहोत हे बोलण्याचा त्यांना काय अधिकार? गद्दारी तुम्ही केली. ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याशी आघाडी केली. आम्ही तुमच्यामागे नतमस्तक होऊन गेलो. आम्ही तुमचं ऐकलं. परंतु आमदारांची कामे होत नव्हती. आम्ही तुमच्याकडे तक्रारी केल्या. परंतु त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.  

जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्या मतावर खासदार झाला. शिवसेना कुणाची काय, ती आमचीच आहे. आम्ही काय कमळावर उभे आहोत का? आमचं त्यांच्याशी लव्ह मॅरेज होतं. आम्ही आय लव्ह यू म्हटलं. काय वाईट केले आम्ही. शिवसेना आमचीच आहे. आम्ही बाळासाहेबांना सोडलं नाही. आनंद दिघेंना सोडलं नाही. आम्ही पक्ष सोडला नाही. आमच्या खांद्यावर भगवा झेंडा. जो आमच्यासोबत राहील तो आमचा. जो येतो तो टीका करतोय. आयुष्यभर संघर्ष केलेल्या माणसांवर बोलतायेत असा समाचार त्यांनी टीकाकारांचा घेतला. 

तसेच परिणामांचा विचार करून राजकारण चालत नाही. संघर्ष जीवनाची यात्रा मानून वाटचाल करा. देव तुमच्या पाठिशी आहे. संघर्षाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. संघर्ष हे भविष्य आहे. कुणाला कुठल्याही पक्षाचं तिकीट दिलं तरी माणूस दर्जेदार लागतो. ५ लाख वाटून डिपॉझिट वाचवू शकत नाही. पक्षाचं योगदान निश्चित असते परंतु माणसालाही किंमत आहे असं सांगत गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला टोला लगावला. 

३२ वर्षाचं पोरगं गोधडीत होतं, ते आमच्यावर टीका करतंयदरम्यान, ३५ वर्ष आम्ही काय केले सगळ्यांना माहिती आहे. कुणी झेंडा लावायला तयार नव्हतं तेव्हा झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे, तडीपारी भोगणारे, जेलमध्ये जाणारे आम्ही आहोत. ३०२ आमच्यावर आहेत. ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे गोधडीत होता तो आमच्यावर टीका करतोय. तुम्ही संपत्तीचे मालक होऊ शकता परंतु विचारांचे वारस होऊ शकत नाही. विचारांचे वारसदार गुलाबराव पाटील आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत. तुमचं पक्षात योगदान काय आहे? उद्धव ठाकरेंचे चिरंजीव. उद्धव ठाकरेंना आमच्यावर बोलण्याचा १०० टक्के अधिकार परंतु आदित्य ठाकरेंचा मुळीच आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं. 

त्याचसोबत टीका करणाऱ्याला करू द्या, परंतु इतिहासात आमच्या उठावाची नोंद होईल. आम्ही सांगून निघालो. हे सरकार वाचू शकलं असतं. परंतु चहापेक्षा किटली गरम अशी संजय राऊतांची भाषा होती. ३५ वर्ष एकच झेंडा, एकच मैदान, हिंदुह्द्रयसम्राट म्हणणाऱ्या आमच्यासारख्यांना तुम्ही दोष देता, टीका करता लाज वाटली पाहिजे. कोण संजय राऊत, जो एका वार्डातून निवडून आला नाही असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे