शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

सोलापूरच्या पाण्याच्या टाकीचे काय होणार?

By admin | Updated: October 26, 2015 02:12 IST

सोलापूर शहरातील पाण्याची टाकी ज्या जमिनीवर (सर्व्हे क्र. ३०५/३ए) गेली सुमारे ३० वर्षे उभी आहे, ती जमीन महापालिकेने येत्या दोन वर्षांत जमीन मालकाकडून रीतसर मोबदला देऊन संपादित करावी.

मुंबई : सोलापूर शहरातील पाण्याची टाकी ज्या जमिनीवर (सर्व्हे क्र. ३०५/३ए) गेली सुमारे ३० वर्षे उभी आहे, ती जमीन महापालिकेने येत्या दोन वर्षांत जमीन मालकाकडून रीतसर मोबदला देऊन संपादित करावी. अन्यथा टाकी पाडून टाकून जमीन मूळ मालकास होती तशी परत करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.पाण्याची टाकी बांधलेली ही ८९६ चौ. मीटर जमीन सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन कायद्यानुसार रीतसर संपादित न करता ‘बॉम्बे रेक्विझिशन अ‍ॅक्ट’नुसार २८ मे १९८६ रोजी केवळ अधिग्रहित केली होती. ही जमीन मरहूम डॉ. मोहम्मद अली नवाबसाहेब वाडवान यांच्या मालकीची होती. त्यानंतर २९ वर्षे चार महिने लोटले तरी जमीन रीतसर संपादित करून आपल्याला मोबदलाही दिला जात नाही किंवा जमीनही परत केली जात नाही म्हणून डॉ. मोहम्मद अली यांच्या वारसांनी रिट याचिका केली होती.न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर करताना असा निकाल दिला की, पाण्याची टाकी पाडून टाकून शहराची गैरसोय व्हावी, असे वाडवान कुटुंबीयांचेही म्हणणे नाही. आपली जमीन रीतसर संपादित करून त्याचा कायद्यानुसार योग्य मोबदला मिळावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोलापूर महापालिका व राज्य सरकार यांनी टाकी बांधण्यासाठी वापरलेली ही जमीन रीतसर संपादित करून त्याचा मोबदला देण्याची कारवाई येत्या २ वर्षांत पूर्ण करावी. मात्र २ दोन वर्षांनंतरही जमीन संपादनाची कारवाई पूर्ण केली गेली नाही, तर महापालिकेस पाण्याची टाकी पाडून जमीन आधी होती त्या स्थितीत मूळ मालकास परत करावी लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.न्यायालयाने म्हटले की, ‘रेक्विझिशन अ‍ॅक्ट’नुसार अधिग्रहित केलेली जमीन सरकार कायमस्वरूपी स्वत:कडे ठेवू शकत नाही. यासाठी कायद्याने जास्तीतजास्त १९ वर्षांची मुदत घालून दिली आहे. वाडवान यांच्या जमिनीच्या बाबतीत ही मुदत २००५मध्येच संपली व खरेतर सरकारने तेव्हाच त्यांना जमीन परत द्यायला हवी होती. पण तसे न करता सरकारने जमीन संपादित करण्याची कारवाई सुरू केली. पण नंतरच्या ८ वर्षांतही हे संपादन पूर्ण केले गेले नाही. परिणामी, वाडवान यांची जमीन सरकारने २९ वर्षे ४ महिने स्वत:कडे ठेवली. वाडवान यांची जमीन अधिग्रहित करण्याची मूळ कारवाईच दूषित झाल्याने न्यायालयाने ती रद्द केली. मात्र जमिनीवर पाण्याची टाकी आहे, हे लक्षात घेऊन न्यायालयाने जमीन पालिकेला २ वर्षांची मुदत दिली.