शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एवढी मोठी जमीन देऊन सरकार कोणते सार्वजनिक हित साधणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 04:54 IST

मराठवाड्यात उसाचे संशोधन का?

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडी सरकारने कोणते सार्वजनिक हित पाहून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालन्यातील ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय घेतला, हा प्रश्न सरकारला अडचणीत आणणारा ठरणार आहे. संपादित केलेली जमीन खाजगी संस्था किंवा व्यक्तीला देताना त्यात ‘सार्वजनिक हित’ असले पाहिजे असे कायदा सांगतो. उसाचे चांगले वाण विकसित करण्याच्या संशोधनासाठी जमीन दिली असेल तर त्यात ठराविक ऊ स उत्पादक शेतकऱ्यांचे हित होईल. मग ते सार्वजनिक हित कसे होणार?

या संस्थेला जमीन देण्याचा विषय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही होता. त्यांनही सकारात्मक भूमिका घेतली होती, पण त्यावेळीही सार्वजनिक हिताच्या मुद्द्यामुळे हा विषय मागे पडला. नव्या सरकारमध्ये ही फाइल फिरू लागली तेव्हाही विधी व न्याय आणि महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जमीन देण्यास नकार दिला होता. त्यांचे नकार फाइलीवर आहेत. तरीही जमीन देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आयत्या वेळी आणला गेला. हा प्रस्ताव आयत्या वेळी आणण्यासारखा होता का? अशी कोणती तातडी होती, किंवा असा कोणता वैज्ञानिक प्रयोग ती जागा मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नव्हता?, असे सवाल विचारले जात आहे.

जी जमीन वसंतदादा इन्स्टिट्यूटला मिळणार आहे, ती कृषी खात्याच्या तालुका बीजरोपण केंद्रासाठी संपादित केली होती. विशिष्ट कारणांसाठी संपादित केलेली जमीन व्यक्ती वा संस्थेला देताना निविदा मागवाव्यात किंवा लिलाव पद्धतीचा अवलंब करावा, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सांगतात. या प्रकरणात ते झाले नाही. रामदेव बाबांच्या पतंजलीला नागपूरची जमीन देण्यात आली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने २५ जुलै २०१९ रोजी महसूल विभागाच्या नियमावलीत बदल केले होते. त्यानुसार अतिविशिष्ट गुणवत्ताधारक, अपवादात्मक ख्यातनाम व्यक्ती किंवा संस्थेला निविदा न मागविता किंवा लिलाव न करता थेट जमीन देता येते, अशी पळवाट होती. मात्र रामदेव बाबांना जमीन देतानाही जाहिरात देण्यात आली होती, ही बाब दुर्लक्षित केली गेली.

वसंतदादा इन्स्टिट्यूटचे काम तपासून अटी, शर्तीसह निर्णय घ्यावा असे मत विधी व न्याय विभागाने दिले होते. त्यामुळेच जवळपास १० कोटी रुपये मूल्य असणारी ही जमीन संस्थेला देऊ नये असा शेरा महसूल विभागाच्या प्रधान सचिव बी. वेणूगोपाळ रेड्डी यांनी लिहिला होता. तेथे ५१ हेक्टर जमीन शिल्लक होती, म्हणून तेवढी मागितली. जर २० हेक्टर असती तर तेवढी मागितली असती का?वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने नेमकी किती जमीन मागितली होती? त्यावर कोणते प्रकल्प उभारले जाणार आहेत?, याचा अभ्यास वित्त व नियोजन, महसूल, सहकार, विधी व न्याय विभागांनी केला का? हेही प्रश्न आहेत.या झाल्या तांत्रिक बाबी. उसाचे चांगले वाण तयार करण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी ही जमीन भाडेतत्त्वावर देत असल्याचे कारण दिले आहे. मात्र खरी गडबड आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या हेतूविषयी वा कामाविषयी शंका घेण्याचे कारण नाही. मात्र जिथे भरपूर ऊस देणारे वाण शोधण्याचे काम होणार आहे, त्या मराठवाड्यातील सगळी धरणं आता फक्त पिण्याच्या पाण्यापुरती उरली आहेत. मराठवाड्यात वेळीच ऊस घेण्याच्या अट्टाहास सोडला नाही, तर या प्रदेशाचे वाळवंट होईल अशी भीती जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी व्यक्त केली आहे. मराठवाड्याची पाणीपातळी एकदम खाली गेलेली आहे.

मराठवाड्याला उजनीचे पाणी आणण्याच्या विषयाने अजूनही वेग घेतलेला नाही. मराठवाड्याची शेती जिरायती आहे. तेथे कोणती पिके घ्यावीत, असलेल्या पाण्याचा वापर कसा केला म्हणजे शेती फायद्याची होईल, याच्या अभ्यासाची गरज आहे. मात्र भरपूर ऊ स देणारे वाण शोधण्यासाठी जमीन देण्याचा देणे हा मराठवाड्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ज्या लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला, त्या जिल्ह्यात थोडा पाऊस येताच, जिल्हा बँकेने उसासाठी कर्ज देणे सुरू करीत असल्याचे एसएमएस शेतकऱ्यांना पाठवले होते. अशी येथील नेत्यांची शेतीशी बांधिलकी आहे. या भागातील मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध केला की नाही हेही समजायला हवे. उसाऐवजी आहे त्या पाण्यात शेतीचे नवे प्रयोग करण्यासाठी जमीन दिली असती हेतूवर प्रश्न निर्माण झाले नसते. दुर्दैवाने ते आता होत आहेत व होत राहतील.