शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:38 IST

समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

-बालाजी देवर्जनकर, नागपूरसमाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे इतवारीतून १८८१ पासून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढली जाते. जुलमी इंग्रजांच्या कारवायांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’ निघण्याची परंपरा सुरू झाली. तर परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व देश स्वतंत्र व्हावा या देशभक्ती भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाजबांधवांनी ‘पिवळी मारबत’ कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पिवळी मारबत निघते.नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा असलेली मारबत आणि बडग्यांची मिरवणूक यंदा सोमवारी, दि. १० सप्टेंबरला निघेल. पारंपरिक काळी व पिवळी मारबत वाढती रोगराई व समाजात बोकाळलेल्या कुप्रथांना ‘आपल्यासोबत घेऊन जा’, असे सांगणारे ‘बडगे’ या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असतात. पोळ््याच्या सणाने श्रावण महिना संपत असतानाही या मिरवणुकीत नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशी घोषणा देत कुप्रथा, कुनिती, भ्रष्टाचाराचा नाश होवो, रोगराई दूर सरो, असे साकडे मारबतीला घातले जाते. ही गौरवशाली परंपरा उपराजधानीने अगदी उत्साहाने जोपासली आहे.बैठक मांडून बसलेली २० फुट उंचीची, संपूर्ण पिवळ्या रंगाची, आकर्षक दागिन्यांची मढलेली ही मारबत बघायला विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतात. इतवारी धान्य बाजारातून निघणारी काळी मारबतची परंपराही अशीच गौरवशाली. लाल रंगाची लांबलचक जीभ बाहेर काढलेली, प्रचंड वटारलेले डोळे अशा क्रोधित देवीच्या रुपात असलेली ही मारबत या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असते. खरे तर पुढील काळात या मारबतीच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यास सुरुवात झाली. या मिरवणुकीत निघणाऱ्या बडग्यांच्या माध्यमातून आता राजकीय व्यंग, भ्रष्टाचार, देशपातळीवरील गुन्हेगारी, सामाजिक गमतीजमती हे विषय विशेष आकर्षण असतात. विषयांची मांडणी योग्यतऱ्हेने व्हावी यासाठी महिनाभरापासून ही मंडळे जीवाचे रान करतात. मारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात. हे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात. बहुदा एखाद्या बड्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिकृतीही विशेष आकर्षण असते. म्हणूनच ‘मारबत’ व ‘बडगे’ ही मिरवणूक नागपूरच्या वैशिष्ट्यात भर टाकणारी आहे. यंदा पिवळी मारबतला १३४ तर काळी मारबतला १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.( छायाचित्रे -  मुकेश कुकडे, संजय लचुरिया)

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर