शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

‘घेऊन जा गे मारबत’, नागपूरची ‘मारबत’ व ‘बडगे’ परंपरा नेमकी काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 16:38 IST

समाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

-बालाजी देवर्जनकर, नागपूरसमाजातील अनिष्ठ प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने नागपुरात ‘तान्हा पोळ्या’ला ऐतिहासिक ‘काळी’ व ‘पिवळी’ मारबत काढण्यात येते. पिवळ्या मारबतीसोबत काळ्या मारबतीचीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. श्री देवस्थान पंच कमिटीतर्फे इतवारीतून १८८१ पासून ‘काळी मारबत’ची मिरवणूक काढली जाते. जुलमी इंग्रजांच्या कारवायांचा निषेध करण्यासाठी ‘काळी मारबत’ निघण्याची परंपरा सुरू झाली. तर परकीयांच्या गुलामगिरीचे पाश तुटावेत व देश स्वतंत्र व्हावा या देशभक्ती भावनेने प्रेरित होऊन १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तेली समाजबांधवांनी ‘पिवळी मारबत’ कमिटीची स्थापना केली. तेव्हापासून पिवळी मारबत निघते.नागपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा असलेली मारबत आणि बडग्यांची मिरवणूक यंदा सोमवारी, दि. १० सप्टेंबरला निघेल. पारंपरिक काळी व पिवळी मारबत वाढती रोगराई व समाजात बोकाळलेल्या कुप्रथांना ‘आपल्यासोबत घेऊन जा’, असे सांगणारे ‘बडगे’ या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असतात. पोळ््याच्या सणाने श्रावण महिना संपत असतानाही या मिरवणुकीत नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. ‘घेऊन जा गे मारबत’, अशी घोषणा देत कुप्रथा, कुनिती, भ्रष्टाचाराचा नाश होवो, रोगराई दूर सरो, असे साकडे मारबतीला घातले जाते. ही गौरवशाली परंपरा उपराजधानीने अगदी उत्साहाने जोपासली आहे.बैठक मांडून बसलेली २० फुट उंचीची, संपूर्ण पिवळ्या रंगाची, आकर्षक दागिन्यांची मढलेली ही मारबत बघायला विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येतात. इतवारी धान्य बाजारातून निघणारी काळी मारबतची परंपराही अशीच गौरवशाली. लाल रंगाची लांबलचक जीभ बाहेर काढलेली, प्रचंड वटारलेले डोळे अशा क्रोधित देवीच्या रुपात असलेली ही मारबत या मिरवणुकीचे विशेष आकर्षण असते. खरे तर पुढील काळात या मारबतीच्या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यास सुरुवात झाली. या मिरवणुकीत निघणाऱ्या बडग्यांच्या माध्यमातून आता राजकीय व्यंग, भ्रष्टाचार, देशपातळीवरील गुन्हेगारी, सामाजिक गमतीजमती हे विषय विशेष आकर्षण असतात. विषयांची मांडणी योग्यतऱ्हेने व्हावी यासाठी महिनाभरापासून ही मंडळे जीवाचे रान करतात. मारबत ही जवळपास सारख्याच स्वरुपाची असली तरी ‘बडगे’ मात्र वेगवेगळ्या विषयांवर असतात. हे विषय मिरवणूक निघाल्यावरच कळतात. बहुदा एखाद्या बड्या राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रतिकृतीही विशेष आकर्षण असते. म्हणूनच ‘मारबत’ व ‘बडगे’ ही मिरवणूक नागपूरच्या वैशिष्ट्यात भर टाकणारी आहे. यंदा पिवळी मारबतला १३४ तर काळी मारबतला १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.( छायाचित्रे -  मुकेश कुकडे, संजय लचुरिया)

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर