शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

धरण उशाला अन् कोरड घशाला; राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ‘बाभळी’चं पाणी तेलंगणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:06 AM

देशभरात बहुचर्चित ठरलेल्या बाभळी बंधा-याचा वाद महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा राज्यात झाला.

धर्माबाद (जि़ नांदेड) : धर्माबाद तालुक्यातील बाभळीच्या कोरड्याठाक बंधाºयाचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १ जुलै रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. दुष्काळी परिस्थितीने होरपळलेल्या या परिसरातील नागरिक, शेतकऱ्यांचे हक्काचे ऐन पावसाळ्यातील पाणी तेलंगणात जाणार आहे.देशभरात बहुचर्चित ठरलेल्या बाभळी बंधा-याचा वाद महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा राज्यात झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. २८ फेब्रुवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तीन अटी घालत निकाल दिला. त्यानुसार १ जुलै रोजी बंधाºयाचे सर्व गेट वर उचलले जाणार, २९ आॅक्टोबर रोजी बंधाºयाचे सर्व गेट खाली टाकणार आणि १ मार्च रोजी बंधाºयातील पाणीसाठापैकी (.६ दशांश) सहा टीएमसी पाणी श्रीरामसागर (पोचमपाड धरण) ला सोडावे, अशा या तीन जाचक अटी आहेत.या वादग्रस्त बंधाºयाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २९ आॅक्टोबर २०१३ रोजी झाले. त्यावर्षी उशिरा पर्जन्यमान झाल्यामुळे जेमतेम पाणीसाठा बंधाºयात शिल्लक राहिला. १ जुलै रोजी गेट उघडावे लागणार असल्याने पावसाळ्यातील पाणी तेलंगणात निघून जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर २९ आॅक्टोबर रोजी गेट बंद करायचे आहेत. त्यामुळे बंधाºयात पाणीसाठा उपलब्ध होणार नाही. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गेट बंद व चालू करण्याच्या तारखा बदलून मिळण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी, ही मागणी गेल्या सहा वर्षांपासून होत आहे. याकडे मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे.नांदेडपासून १०० कि.मी अंतरावर मांजरा नदी गोदावरीला मिळते. तिथून ७ कि.मी अंतरावर वरच्या भागात बाभळी बंधारा बांधण्यात आला आहे. २.७४ टीएमसी म्हणजेच जवळ जवळ १०० द.ल.घ.मी पाणी वापरण्याची व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यान्वित झाली. नदीकाठच्या ६० गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले आणि जवळ जवळ ८०० हेक्टर सिंचनाची सोय निर्माण झाली, मात्र राज्य सरकारच्या अक्षम्य अनास्थेमुळे हे हक्काचे पाणी आता तेलंगणात जाणार आहे.बारा गावांचे प्रकल्पही रेंगाळलेपरिसरातील बंद पडलेल्या बारा गावांचे जलसिंचन प्रकल्प (लिफ्ट इरिगेशन) चालू करण्याबाबत शासनस्तरावर गेल्या सहा वर्षांपासून कोणतेही प्रयत्न दिसून येत नसून हा प्रश्न अजूनही रेंगाळत पडला आहे. पावसाळा आॅक्टोबरपर्यंत वाढल्यास बंधाºयात जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहतो. त्या उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून किमान बंद पडलेले जलसिंचन प्रकल्प चालू केल्यास परिसरातील बारा गावच्या शेतकºयांना त्याचा फायदा होणार आहे.सुरक्षितता वाºयावरमहाराष्ट्र व तेलगंणा राज्यात बाभळी बंधारा निर्मितीपासून वाद असताना बंधाºयाच्या सुरक्षिततेबद्दल महाराष्ट्र शासन उदासिन आहे. सेक्युरटी गार्डची नियुक्ती नाही. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याबाबत वारंवार आवाज उठविण्यात येऊनही, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र