शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:35 IST

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा 

अमरावती : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रकल्पांतील जलसाठा ३३.६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. त्यात अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांच्या जलसाठ्यानं तळ गाठला आहे. अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भावरील जलसंकट गडद झालंय. त्यामुळे विदर्भात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.२३ एप्रिलच्या नोंदीनुसार राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो २६.८६ टक्के इतका होता. अमरावती विभागातील ४४३ प्रकल्पांमध्ये १९.३५ टक्के, नागपूर विभागातील ३८५ प्रकल्पांमध्ये १७.४४ टक्के, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ५०.७१ टक्के, नाशिक विभागातील ५६१ प्रकल्पांमध्ये ३५.७४ टक्के, पुणे विभागातील ७२५ प्रकल्पांमध्ये ३८.९० टक्के आणि मराठवाडा विभागातील ९५७ प्रकल्पांमध्ये ३१.१७ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असल्यानं व तप्त उन्हानं मृत साठ्यात वाढ होत असल्यानं विदर्भातील जलसंकटात भर पडणार आहे.अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.८३ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.२८, तर ४९ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २०.२० टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.८१ टक्के, तर ३२६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १७.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सर्वाधिक मोठ्या गोसे खुर्द प्रकल्पात अवघा ६.४३ टक्के, तर अमरावतीच्या काटेपूर्णात ८.१० टक्के, अप्पर वर्धा ४०.६५ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के, नळगंगा १५.८२ टक्के, पेनटाकळी ११.२६ टक्के, अरुणावती ७.१०, तर इसापूर १.७१ टक्के, पूस १४.५७ टक्के, बेंबळा १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

६७१ टँकरनं पाणीपुरवठाराज्यातील ६७१ गावे व २४७ वाड्यांमध्ये ६७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक ३९६ टँकरने मराठवाडा विभागात पाणी पुरवलं जात आहे. कोकणात ४८, नाशिक विभागात ८५, पुण्यात ०४, अमरावतीमध्ये १३७ टँकर चालवले जात आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४९३ टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात १७८ नं वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूरVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा