शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

विदर्भावर जलसंकट; अमरावती, नागपूर विभागात फक्त 18% पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:35 IST

राज्यात सध्या ३३.६० टक्के जलसाठा 

अमरावती : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील प्रकल्पांतील जलसाठा ३३.६० टक्क्यांवर स्थिरावला आहे. त्यात अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांच्या जलसाठ्यानं तळ गाठला आहे. अन्य विभागांच्या तुलनेत विदर्भावरील जलसंकट गडद झालंय. त्यामुळे विदर्भात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.२३ एप्रिलच्या नोंदीनुसार राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी तो २६.८६ टक्के इतका होता. अमरावती विभागातील ४४३ प्रकल्पांमध्ये १९.३५ टक्के, नागपूर विभागातील ३८५ प्रकल्पांमध्ये १७.४४ टक्के, कोकणातील १७५ प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ५०.७१ टक्के, नाशिक विभागातील ५६१ प्रकल्पांमध्ये ३५.७४ टक्के, पुणे विभागातील ७२५ प्रकल्पांमध्ये ३८.९० टक्के आणि मराठवाडा विभागातील ९५७ प्रकल्पांमध्ये ३१.१७ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती व नागपूर विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक असल्यानं व तप्त उन्हानं मृत साठ्यात वाढ होत असल्यानं विदर्भातील जलसंकटात भर पडणार आहे.अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये १५.८३ टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७.२८, तर ४९ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २०.२० टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १७ मोठ्या प्रकल्पांमध्ये १६.८६ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये २०.८१ टक्के, तर ३२६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १७.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील सर्वाधिक मोठ्या गोसे खुर्द प्रकल्पात अवघा ६.४३ टक्के, तर अमरावतीच्या काटेपूर्णात ८.१० टक्के, अप्पर वर्धा ४०.६५ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के, नळगंगा १५.८२ टक्के, पेनटाकळी ११.२६ टक्के, अरुणावती ७.१०, तर इसापूर १.७१ टक्के, पूस १४.५७ टक्के, बेंबळा १३.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. 

६७१ टँकरनं पाणीपुरवठाराज्यातील ६७१ गावे व २४७ वाड्यांमध्ये ६७१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात सर्वाधिक ३९६ टँकरने मराठवाडा विभागात पाणी पुरवलं जात आहे. कोकणात ४८, नाशिक विभागात ८५, पुण्यात ०४, अमरावतीमध्ये १३७ टँकर चालवले जात आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये ४९३ टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात १७८ नं वाढ झाली आहे.

 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईnagpurनागपूरVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा