शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विचारांचे युद्ध हवेच - मोहन जोशी

By admin | Updated: December 24, 2014 09:17 IST

जो अनुभवी आहे, तो आपले विचार मांडतोच. काही प्रमाणात वादही होतात. वाद होणे हे चांगलेच लक्षण आहे. उलट ‘विचारांचे वॉर’ हवेच.

पुणे : जो अनुभवी आहे, तो आपले विचार मांडतोच. काही प्रमाणात वादही होतात. वाद होणे हे चांगलेच लक्षण आहे. उलट ‘विचारांचे वॉर’ हवेच. त्यातूनच कामाविषयीचे मार्गदर्शन मिळत राहते, असे स्पष्ट मत अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले. जयंत बेंद्रे यांनी शब्दांकन केलेल्या मोहन जोशी यांच्या ‘नटखट’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुण्यात होत आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रवास उलगडताना ते म्हणाले, वयाच्या ६ ते ६१ वर्षांपर्यंतचा काळ यामध्ये शब्दबद्ध करण्यात आला आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अनुभव लिहित आहे, त्यासाठी ३६ प्रश्न काढले, मात्र लिहिण्याचे विशेष ज्ञान नसल्याने कॅसेटमध्ये बोलणे रेकॉर्ड करून ठेवत होतो. अशा सुमारे ६५ कॅसेटस् झाल्या.स्वत:च्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करताना जे काही चढउतार आले, चांगले वाईट-अनुभव आले, कोणत्या परिस्थितीतून कुठून कुठपर्यंत आलो त्याचा धांडोळा घेत ज्या रसिकांनी प्रेम दिले त्यांच्यासह नवीन पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे, हे यामागचे प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माणूस मोकळा होतो तेव्हाच तो खरे बोलतो, पुस्तकातील एकही गोष्ट कल्पातीत नाही, त्यातील आकलन हे प्रांजळ आहे. यापुढील आयुष्य कसे जगायचे हे देखील ठरवले आहे. यावेळी बेंद्रे आणि सुनील महाजन उपस्थित होते.