शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

विखेंनी आमदारकी सोडली; लवकरच भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:38 IST

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेसमधील पाच आमदारांशी खलबतं केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला. विखेंचा भाजप प्रवेश ही केवळ आता औपचारिकता उरली आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले. शिर्डी आणि नगरमध्ये त्यांनी भाजप उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी विखेंनी राजीनामा देण्यापूर्वी राहुल बोंद्रे (चिखली), गोपाळ अग्रवाल (गोंदिया), सुनील केदार (सावनेर), जयकुमार गोरे (माण) आणि भारत भालके (पंढरपूर) या काँग्रेस आमदारांशी चर्चा केली. सोबत सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार होते. विखेंसोबत हे आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त पसरताच आ. बोंद्रे यांनी खुलासा करत आपण भाजपमध्ये जाणार नाही, पण विखे यांनी राजीनामा देऊ नये, असे समजावण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होता, असे सांगितले. तर मला पक्षाने बडतर्फ केले आहे, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे आ. सत्तार यांनी सांगितले.

भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी १३५ जागा आणि १८ जागा मित्रपक्षांना, असा युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. सहा अपक्ष आणि रासपचे एक असे सात जण भाजपसोबत आहेत. असे १२९ आमदार सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून येणाऱ्यांसाठी भाजपकडे फक्त ६ जागा शिल्लक आहेत. काँग्रेसमधून जे येतील त्या ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्यापैकी जे दोन नंबरवर होते त्यांचे काय करायचे? समजा त्यांनी बंडखोरी केली अथवा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून लढले तर पक्षासाठी ती वेगळीच डोकेदुखी ठरू शकते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.२०१४ मध्ये काय घडले होते?सुनील केदार यांनी शिवसेना उमेदवाराचा ९,१७५ मतांनी पराभव केला होता. ते भाजपमध्ये गेल्यास सेनेला ही जागा सोडावी लागेल. राहुल बोंद्रे यांनी १४,०६१ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता, तर गोपाळ अग्रवाल यांनी भाजप उमेदवाराचा १०,७५८ मतांनी पराभव केला होता.

जागा वाटपात या जागा भाजपकडे आहेत, पण स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून यांना भाजपमध्ये घ्यावे लागेल. भारत भालके यांनी प्रशांत परिचारक यांचा ८,९१३ मतांनी पराभव केला होता, पण आता परिचारक भाजप पुरस्कृत आमदार झाल्याने भालके यांना भाजपमध्ये जाणे फायद्याचे ठरू शकते.

जयकुमार गोरे यांनी त्यांचे भाऊ शेखर गोरे यांचा २३,३५१ मतांनी पराभव केला होता, यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.आपण भाजपमध्ये प्रवेश करू. मला मंत्रिपद द्यायचे की कसे, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत होती, दिल्लीतल्या नेत्यांविषयी तक्रार नाही, पण राज्यातील नेतृत्वाने आपल्याला साथ दिली नाही. उलट आपली कोंडी करण्याचाच प्रयत्न केला. - राधाकृष्ण विखे पाटील

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आ. अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शविला आहे. त्यांनी मंगळवारी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तार यांच्या विरोधात रणनीती आखली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा