शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विखेंनी आमदारकी सोडली; लवकरच भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 02:38 IST

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले

अतुल कुलकर्णी मुंबई : काँग्रेसमधील पाच आमदारांशी खलबतं केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला. विखेंचा भाजप प्रवेश ही केवळ आता औपचारिकता उरली आहे.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगरची जागा पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी सोडण्याच्या कारणावरून राधाकृष्ण विखे काँग्रेसपासून दुरावले. शिर्डी आणि नगरमध्ये त्यांनी भाजप उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मंगळवारी विखेंनी राजीनामा देण्यापूर्वी राहुल बोंद्रे (चिखली), गोपाळ अग्रवाल (गोंदिया), सुनील केदार (सावनेर), जयकुमार गोरे (माण) आणि भारत भालके (पंढरपूर) या काँग्रेस आमदारांशी चर्चा केली. सोबत सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार होते. विखेंसोबत हे आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त पसरताच आ. बोंद्रे यांनी खुलासा करत आपण भाजपमध्ये जाणार नाही, पण विखे यांनी राजीनामा देऊ नये, असे समजावण्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होता, असे सांगितले. तर मला पक्षाने बडतर्फ केले आहे, त्यामुळे मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असे आ. सत्तार यांनी सांगितले.

भाजपा आणि शिवसेना प्रत्येकी १३५ जागा आणि १८ जागा मित्रपक्षांना, असा युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. सहा अपक्ष आणि रासपचे एक असे सात जण भाजपसोबत आहेत. असे १२९ आमदार सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून येणाऱ्यांसाठी भाजपकडे फक्त ६ जागा शिल्लक आहेत. काँग्रेसमधून जे येतील त्या ठिकाणी भाजप-शिवसेना यांच्यापैकी जे दोन नंबरवर होते त्यांचे काय करायचे? समजा त्यांनी बंडखोरी केली अथवा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून लढले तर पक्षासाठी ती वेगळीच डोकेदुखी ठरू शकते, असे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.२०१४ मध्ये काय घडले होते?सुनील केदार यांनी शिवसेना उमेदवाराचा ९,१७५ मतांनी पराभव केला होता. ते भाजपमध्ये गेल्यास सेनेला ही जागा सोडावी लागेल. राहुल बोंद्रे यांनी १४,०६१ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला होता, तर गोपाळ अग्रवाल यांनी भाजप उमेदवाराचा १०,७५८ मतांनी पराभव केला होता.

जागा वाटपात या जागा भाजपकडे आहेत, पण स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून यांना भाजपमध्ये घ्यावे लागेल. भारत भालके यांनी प्रशांत परिचारक यांचा ८,९१३ मतांनी पराभव केला होता, पण आता परिचारक भाजप पुरस्कृत आमदार झाल्याने भालके यांना भाजपमध्ये जाणे फायद्याचे ठरू शकते.

जयकुमार गोरे यांनी त्यांचे भाऊ शेखर गोरे यांचा २३,३५१ मतांनी पराभव केला होता, यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.आपण भाजपमध्ये प्रवेश करू. मला मंत्रिपद द्यायचे की कसे, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये आपली घुसमट होत होती, दिल्लीतल्या नेत्यांविषयी तक्रार नाही, पण राज्यातील नेतृत्वाने आपल्याला साथ दिली नाही. उलट आपली कोंडी करण्याचाच प्रयत्न केला. - राधाकृष्ण विखे पाटील

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आ. अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच विरोध दर्शविला आहे. त्यांनी मंगळवारी सिल्लोडमध्ये बैठक घेऊन सत्तार यांच्या विरोधात रणनीती आखली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी सांगितले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपा