शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 09:03 IST

अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई - राज्याच्या राजकारणात कधी काहीही घडू शकतं हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बऱ्याचदा पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला. त्यानंतर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले. अजित पवारांना मित्रपक्षांनी टार्गेट केले, त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. अशातच राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी प्रकाश आंबेडकर आणि अजित पवार हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्रातील चित्र बदलेल अशी वैयक्तिक भूमिका मांडली. त्यावर आता वंचित बहुजन आघाडीकडूनही भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे महायुती फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्याबाबत विधान अमोल मिटकरींनी केले. अजित पवार आणि त्यांचा पक्ष भाजपासोबत आहे. या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी युतीबाबत विचार करू शकणार नाही. जोपर्यंत अजित पवार गटानं भाजपासोबत संबंध तोडला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपाशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे त्यामुळे या विधानाचा आता काही विचार करता येणार नाही असं सांगत रेखा ठाकूर यांनी तूर्तास तरी युतीच्या चर्चेवर पूर्णविराम दिला आहे. 

तर अमोल मिटकरींनी विचारपूर्वक बोलावं, पलटी मारण्याची वेळ येणार नाही असेच बोलावे. सातत्याने आपल्या राजकीय पटलावरती स्वत:च्या विधानापासून पळ काढणे, आपण असं म्हटलेच नाही असं बोलण्याची वेळ येणार नाही अशी काळजी घ्यावी. तुम्ही जाहीरपणे जी इच्छा व्यक्त केली होती तो महाराष्ट्राने पाहिला, पण काही तासांत दुसरा व्हिडिओ समोर आला त्यात तुम्ही ते विधान नाकारतायेत त्यामुळे यापुढे काळजी घ्या असं वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केले.

काय म्हणाले होते अमोल मिटकरी?

जर महायुतीत ५०-५५ जागांवर राष्ट्रवादीची बोळवण होणार असेल तर स्वतंत्र लढण्याची भूमिका पक्ष घेऊ शकतो. हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. पण अजित पवार एकटेच आहेत आणि एकटेच लढतील असं मित्रपक्षांनी समजू नये. राजकारणात काहीही होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून मी प्रकाश आंबेडकरांना नेहमीच आदर्श मानत आलोय. राजकारणात अजित पवार आदर्श आहेत. भलेही मी वंचित बहुजन आघाडीचा नाही. पण बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर आणि कार्य करणारे अजितदादा ही जोडी महाराष्ट्रात पुढे आली तर यापेक्षा गोड क्षण आमच्यासाठी नसेल. आंबेडकरी चळवळ जर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आली तर महाराष्ट्राची दिशा आणि राजकारण फार वेगळे असेल. जर अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावून एकत्र लढले तर मग महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला होता.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवारVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरीMahayutiमहायुती