शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

असंघटित कष्टकऱ्यांना आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची गरज : डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:38 IST

देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.

ठळक मुद्दे९१ व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या डॉ. बाबा आढावांचा 'लोकमत 'शी संवाद

विवेक भुसे- पुणे : लोकशाही समाजवादावर आधारित स्वराज्य बनविण्याचे स्वप्न पाहून आमची पिढी समाजाकारणात उतरली होती़ पण, गरीबी कमी होण्याऐवजी गरीब कमी होतगेले. कोरोनामुळे समाजातील जाती, धर्म, लिंगभेदाची ही सामाजिक, आर्थिक उतरंड बटबटीतपणे समोर आली आहे. देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अशा मजूरांना हजारो किमी पायी चालत गावी जाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने केवळ पैशाचे पॅकेज दिलेआहे.असंघटित वर्गाला असे पॅकेज नको तर त्यांना पत प्रतिष्ठा देणारे पॅकेज हवे आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.डॉ. बाबा आढाव हे सोमवारी १ जूनला ९० वर्ष पूर्ण करुन ९१ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यानिमित्ताने 'लोकमत 'शी संवाद साधताना आढाव म्हणाले, स्वातंत्र्यानंतर घटनेनेच सर्वांना समान मताचा अधिकार देण्यात आला. पणत्याबरोबर सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा व लोकशाही समाजवादाचे स्वप्न आम्ही तरुणांनी तेव्हा पाहिले होते. त्यादृष्टीने जो प्रयत्न केलागेला पाहिजे होता, त्याचा वेग खूप कमी होता. त्यातूनच या असंघटित लोकांना गोळा करुन त्यांना पत मिळवून देण्याचा प्रयत्न मी आपल्या आजवरच्या जीवनातकेला. संघटनेच्या पातळीवर आज हमाल, मापाडी, कागद, काच पत्रा गोळाकरण्याचे काम करणारे, रिक्षाचालक या असंघटितांना समाजात पत मिळली आहे.स्वातंत्र्यानंतर उद्योगधंदे वाढले, त्याचबरोबर गरीब -श्रीमंतामधील विषमता वेगाने वाढली. भांडवलशाहीतून संपत्ती निर्माण करुन तीगरीबांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करण्यात आला होता पण झाले उलटे. साडेतीनशे लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी ७१ टक्के संपती एकवटली गेली आहे. पत कशावर तर ७/१२वर अशा घोषणा देत त्याकाळी शेतकºयांनी जमिनीच्याफेरवाटपाची मागणी केली होती. पण उद्योगधंदे,विकास कामाच्या नावाखाली त्यांच्याकडे असलेल्या जमिनी काढून घेतल्या गेल्या. आता तर सर्व पक्षमुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक बनले आहेत. त्यामुळे समाजवादाची भाषा केवळ घटनेपुरती शिल्लक राहिली आहे.

कोरोनामुळे समाजातील ही विषमता अधिक बटबटीतपणे समोर आली, असे सांगून बाबा आढाव म्हणाले, शेतमजूर, आदिवासी, कष्टकऱ्यांना सामाजिक, आर्थिक पत मिळू न शकल्यामुळेच त्यांचे काही प्रश्न असू शकतील, याकडे लॉकडाऊन लागू करताना दुर्लक्ष केले गेले. त्यातून हजारो कामगारांना शेकडो किमी पायी चालत गाव गाठण्याची वेळ आली. वास्तवाचे भीषण चित्र समाजापुढे आले. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, कोरोनाच्या आपत्तीत जो असंघटितवर भरडला गेला आहे. त्याला आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची खरी गरज आहे.

* पूर्वी आम्ही सर्व भारतीय आमचे बांधव आहेत, अशी प्रार्थना म्हणतो होतो़. आता मी हिंदु असल्याचा गर्व आहे, असे म्हटले जात आहे. हाताची सर्वबोटे सारखी नसतात, असे सांगून समाजातील जाती व्यवस्था, सामाजिक विषमतेचेसमर्थन केले जात आहे.* आम्ही बिल गेटसचे कौतुक करतो़ नवे तंत्रज्ञान आत्मसात करत नाहीत. देशातील बुद्धीमान लोक परदेशात पाणी भरत आहेत.* महाराष्ट्राने देशाला हमाल माथाडी कायदा आणि रोजगार हमी योजना देशाला दिली. आज गावाला परत गेलेल्या लोकांसाठी मनरेगा सुरु करा अशी मागणी केली जात आहे.* छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्हालाही प्रेरणा मिळते. आमचा हमालदरवर्षी मोठी मिरवणुक काढतो. पण त्यापुढचा इतिहासही तितकाच महत्वाचा आहे. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आमच्या हाती लेखणी दिली़आज शनवारवाड्याच्या डागडुजीला निधी मिळतो. पण, ज्या वाड्यातसावित्रीबाईनी बहुजनाच्या हातात पुस्तक दिले. त्या वाड्याचा प्रश्नकोर्टात खिचपत पडला आहे.* आता बदलेल्या तंत्रज्ञानात तुमचा अंगठा हाच पासवर्ड आणि तुमची ओळख झाली आहे. पण ५० वर्षापूर्वी अंगठेबहाद्दर असल्यामुळे हमालाना बँकेत खातेउघडण्यास नकार दिला गेला होता. त्यावेळी बाजीराव रोडवरील बँकेसमोर आपल्याला मोर्चा काढावा लागला होता, अशी आठवण यावेळी बाबा आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारMigrationस्थलांतरण