शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

असंघटित कष्टकऱ्यांना आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची गरज : डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 2:24 PM

देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.

ठळक मुद्दे९१ व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या डॉ. बाबा आढावांचा 'लोकमत 'शी संवाद

विवेक भुसे- पुणे : लोकशाही समाजवादावर आधारित स्वराज्य बनविण्याचे स्वप्न पाहून आमची पिढी समाजाकारणात उतरली होती़ पण, गरीबी कमी होण्याऐवजी गरीब कमी होतगेले. कोरोनामुळे समाजातील जाती, धर्म, लिंगभेदाची ही सामाजिक, आर्थिक उतरंड बटबटीतपणे समोर आली आहे. देशातील कोट्यवधी असंघटित मजूर,कामगारवर्गाला पत देता न आल्यामुळेच कोरोनाच्या आपत्तीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अशा मजूरांना हजारो किमी पायी चालत गावी जाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारने केवळ पैशाचे पॅकेज दिलेआहे.असंघटित वर्गाला असे पॅकेज नको तर त्यांना पत प्रतिष्ठा देणारे पॅकेज हवे आहे, असे मत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.डॉ. बाबा आढाव हे सोमवारी १ जूनला ९० वर्ष पूर्ण करुन ९१ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. त्यानिमित्ताने 'लोकमत 'शी संवाद साधताना आढाव म्हणाले, स्वातंत्र्यानंतर घटनेनेच सर्वांना समान मताचा अधिकार देण्यात आला. पणत्याबरोबर सामाजिक, आर्थिक विषमता दूर करण्याचा व लोकशाही समाजवादाचे स्वप्न आम्ही तरुणांनी तेव्हा पाहिले होते. त्यादृष्टीने जो प्रयत्न केलागेला पाहिजे होता, त्याचा वेग खूप कमी होता. त्यातूनच या असंघटित लोकांना गोळा करुन त्यांना पत मिळवून देण्याचा प्रयत्न मी आपल्या आजवरच्या जीवनातकेला. संघटनेच्या पातळीवर आज हमाल, मापाडी, कागद, काच पत्रा गोळाकरण्याचे काम करणारे, रिक्षाचालक या असंघटितांना समाजात पत मिळली आहे.स्वातंत्र्यानंतर उद्योगधंदे वाढले, त्याचबरोबर गरीब -श्रीमंतामधील विषमता वेगाने वाढली. भांडवलशाहीतून संपत्ती निर्माण करुन तीगरीबांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार करण्यात आला होता पण झाले उलटे. साडेतीनशे लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी ७१ टक्के संपती एकवटली गेली आहे. पत कशावर तर ७/१२वर अशा घोषणा देत त्याकाळी शेतकºयांनी जमिनीच्याफेरवाटपाची मागणी केली होती. पण उद्योगधंदे,विकास कामाच्या नावाखाली त्यांच्याकडे असलेल्या जमिनी काढून घेतल्या गेल्या. आता तर सर्व पक्षमुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक बनले आहेत. त्यामुळे समाजवादाची भाषा केवळ घटनेपुरती शिल्लक राहिली आहे.

कोरोनामुळे समाजातील ही विषमता अधिक बटबटीतपणे समोर आली, असे सांगून बाबा आढाव म्हणाले, शेतमजूर, आदिवासी, कष्टकऱ्यांना सामाजिक, आर्थिक पत मिळू न शकल्यामुळेच त्यांचे काही प्रश्न असू शकतील, याकडे लॉकडाऊन लागू करताना दुर्लक्ष केले गेले. त्यातून हजारो कामगारांना शेकडो किमी पायी चालत गाव गाठण्याची वेळ आली. वास्तवाचे भीषण चित्र समाजापुढे आले. केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पण, कोरोनाच्या आपत्तीत जो असंघटितवर भरडला गेला आहे. त्याला आर्थिक,सामाजिक पत आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या पॅकेजची खरी गरज आहे.

* पूर्वी आम्ही सर्व भारतीय आमचे बांधव आहेत, अशी प्रार्थना म्हणतो होतो़. आता मी हिंदु असल्याचा गर्व आहे, असे म्हटले जात आहे. हाताची सर्वबोटे सारखी नसतात, असे सांगून समाजातील जाती व्यवस्था, सामाजिक विषमतेचेसमर्थन केले जात आहे.* आम्ही बिल गेटसचे कौतुक करतो़ नवे तंत्रज्ञान आत्मसात करत नाहीत. देशातील बुद्धीमान लोक परदेशात पाणी भरत आहेत.* महाराष्ट्राने देशाला हमाल माथाडी कायदा आणि रोजगार हमी योजना देशाला दिली. आज गावाला परत गेलेल्या लोकांसाठी मनरेगा सुरु करा अशी मागणी केली जात आहे.* छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्हालाही प्रेरणा मिळते. आमचा हमालदरवर्षी मोठी मिरवणुक काढतो. पण त्यापुढचा इतिहासही तितकाच महत्वाचा आहे. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आमच्या हाती लेखणी दिली़आज शनवारवाड्याच्या डागडुजीला निधी मिळतो. पण, ज्या वाड्यातसावित्रीबाईनी बहुजनाच्या हातात पुस्तक दिले. त्या वाड्याचा प्रश्नकोर्टात खिचपत पडला आहे.* आता बदलेल्या तंत्रज्ञानात तुमचा अंगठा हाच पासवर्ड आणि तुमची ओळख झाली आहे. पण ५० वर्षापूर्वी अंगठेबहाद्दर असल्यामुळे हमालाना बँकेत खातेउघडण्यास नकार दिला गेला होता. त्यावेळी बाजीराव रोडवरील बँकेसमोर आपल्याला मोर्चा काढावा लागला होता, अशी आठवण यावेळी बाबा आढाव यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारMigrationस्थलांतरण