शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:18 IST

यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षासह अन्य परिक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे कुलगुरू सांगतील यावर मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले होते. राज्यातील 13 कुलगुरुंशी बोलल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी 17 मे रोजी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. आता सप्टेंबर नाही तर नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाहीत, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि गावी गेलेले विद्यार्थी तसेच प्रश्नपत्रिका कोम हाताळणार असे अनेक प्रश्न पाहून कुलगुरुंनीच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, जे विद्यार्थी गावी गेले आहेत, त्यांची परीक्षा कशी घ्यायची, या उत्तरपत्रिका कोण हाताळणार, असे अनेक प्रश्न आहेत. एटीकेटीबाबत सर्व 13 कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. १८ जूनला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक झाली, यावेळी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले होते, असेही सामंत म्हणाले.

 एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणानुसार पास करावे, अशी 13 कुलगुरुंची शिफारस होती. तो पास होत नसल्यास त्याला कोव्हिडच्या परिस्थितीमुळे ग्रेस गुण पद्धत अवलंबावी आणि त्याची एटीकेटी सोडवावी हा देखील मार्ग काढण्यात आला होता. तसेच सरासरी गुण दिल्याने टक्के कमी मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी कोरोना गेल्यानंतर परीक्षेची पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती सामंत यांनी दिली. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

टॅग्स :Uday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस