शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:18 IST

यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षासह अन्य परिक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे कुलगुरू सांगतील यावर मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले होते. राज्यातील 13 कुलगुरुंशी बोलल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी 17 मे रोजी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. आता सप्टेंबर नाही तर नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाहीत, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि गावी गेलेले विद्यार्थी तसेच प्रश्नपत्रिका कोम हाताळणार असे अनेक प्रश्न पाहून कुलगुरुंनीच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, जे विद्यार्थी गावी गेले आहेत, त्यांची परीक्षा कशी घ्यायची, या उत्तरपत्रिका कोण हाताळणार, असे अनेक प्रश्न आहेत. एटीकेटीबाबत सर्व 13 कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. १८ जूनला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक झाली, यावेळी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले होते, असेही सामंत म्हणाले.

 एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणानुसार पास करावे, अशी 13 कुलगुरुंची शिफारस होती. तो पास होत नसल्यास त्याला कोव्हिडच्या परिस्थितीमुळे ग्रेस गुण पद्धत अवलंबावी आणि त्याची एटीकेटी सोडवावी हा देखील मार्ग काढण्यात आला होता. तसेच सरासरी गुण दिल्याने टक्के कमी मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी कोरोना गेल्यानंतर परीक्षेची पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती सामंत यांनी दिली. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

टॅग्स :Uday Samantउदय सामंतuniversityविद्यापीठexamपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस