Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:21 PM2019-08-01T12:21:55+5:302019-08-01T12:31:38+5:30

पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनीमध्ये आतापर्यंत ७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे

Ujani Dam; Minus 19.5 plus 5 percent | Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के

Good News- उजनी धरण; वजा ५९.८८ वरून प्लस २०.५० टक्के

googlenewsNext
ठळक मुद्देएकीकडे उजनी धरण भरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात भीमानदीत नीरेचे पाणी येत आह़ेसोलापूर जिल्ह्यात फारसा पाऊस नसताना नदीला व धरणाला फायदा होतोयपुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे

भीमानगर/अकलूज/पुणे : पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनीमध्ये आतापर्यंत ७७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. वजा ५९.८८ वरून धरण प्लस २०.५०  टक्क्यांवर आले आहे. 

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे़ पुणे जिल्ह्यातील दौंडमधून बुधवारी दुपारी १२ वाजता ७० हजार क्युसेक तर बंडगार्डन येथून २८ हजार ४५६ क्युसेकने  विसर्ग उजनीत येत होता. सायंकाळी ६ वाजता बंडगार्डनमधून २१ हजार २७७ क्युसेक तर दौंडमधून ५७ हजार ३४२ क्युसेक विसर्ग उजनीत येत आहे.

दरम्यान, नीरा नदीतील पाण्याने बुधवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. एकीकडे उजनी धरण भरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात भीमानदीत नीरेचे पाणी येत आह़े  त्यामुळे लवकरच ते औज बंधाºयात पोहोचणार आहे़ त्यामुळे दुग्धशर्करा योग आहे़ पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून सोलापूर जिल्ह्यात फारसा पाऊस नसताना नदीला व धरणाला फायदा होतोय़
पुणे  जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला होता. तर, खडकवासला साखळीतील चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी (८१.८३ टक्के) पाणी जमा झाले आहे. 
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी मृत व ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश धरणात पावसाचा जोर कमी होता. वडज धरणातून २ हजार ३६६ क्युसेक वेगाने सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी १२२० क्युसेक पर्यंत खाली आणले. चासकमान भरण्याच्या मार्गावर असल्याने सायंकाळी ३६८५ क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत होते. खडकवासला धरणातून सकाळी ९,४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. 

बुधवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातील विसर्ग २,५६८ क्युसेकपर्यंत खाली आणला. वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने येथून सायंकाळी तब्बल २२ हजार ६८० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत होते. 
उजनीत मंगळवारी सकाळी उणे ०.९७ टीएमसी साठा होता. बुधवारी सकाळी आठपर्यंत उजनीत ४.०८ टीएमसी पाणीसाठा झाला. सायंकाळी साडेपाच पर्यंत त्यात ७.१६ टीएमसी पाणीसाठा झाला. 

खडकवासला साखळीत जोरदार पाऊस
खडकवासला साखळीतील टेमघर धरणात बुधवारी सकाळी आठ पर्यंत ९०, वरसगाव ८०, पानशेत ७८ आणि खडकवासला येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर २०, वरसगाव ७० आणि पानशेतला ७७ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात १.९७, पानशेत ९.७१, वरसगाव ९.६९ आणि टेमघर धरणात २.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी पाणी (८१.८३ टक्के) जमा झाले आहे. 

Web Title: Ujani Dam; Minus 19.5 plus 5 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.