शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
2
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
3
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
4
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
5
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
6
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
7
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
8
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
9
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
10
ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेले PADU Machine नेमके कसे आणि काय काम करते? सविस्तर माहिती जाणून घ्या
11
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
12
Virat Kohli New Record : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत विराटच ‘धुरंधर’! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
13
वेदांताच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक: ४ दिवसांत १३% वाढ; 'नुवामा'कडून ८०६ रुपयांचं नवं टार्गेट
14
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
15
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
16
Nashik Municipal Election 2026 : निष्ठावंत, पाहुण्यांसह ७६ जणांवर भाजपमधून हकालपट्टीची संक्रांत; उद्धवसेनेतून ५ जणांची हकालपट्टी
17
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
18
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
19
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
20
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:10 IST

शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. 

Uddhav Thackeray Ashish Shelar: अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पिके, जमीन वाहून गेली असून, विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांनी दिल्या जाणाऱ्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधला. ठाकरेंनी केलेल्या टीकेला कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, "हंबरडा फोडण्यापेक्षा स्वत:वर आसूड उगवला असता तर बरे झाले असते उद्धवजी. कोकणात 3 चक्रीवादळ आली, मदत आम्ही दिली. कर्जमाफी अर्धवट केली, ती आम्ही पूर्ण केली. बांधावर 50,000 ची घोषणा केली, 1-2 रुपयांचे चेक दिले."

"सत्तेत असताना ज्यांनी गावांत शेतकरी मारला आणि कोरोनात सामान्य मुंबईकर. स्वत:ची पापं आठवा, स्वत:वर आसूड उगवण्यापलिकडे तुमच्याकडे काहीही उरणार नाही. हंबरडा राखून ठेवा, तो मुंबई, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या मदतीला असेल", अशा शब्दात शेलारांनी ठाकरेंवर टीकेचे बाण डागले.   उद्धव ठाकरेंनी मोर्चात काय मागणी केली?

उद्धव ठाकरे मोर्चात बोलताना म्हणाले, "मी एका अटीवर सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) जे बोलले की, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार. मग मुख्यमंत्र्यांना तुमच्यावतीने आव्हान देतोय की, दिवाळीपूर्वी त्या साडेतीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं आपण नंतर बघू", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारकडे केली आहे. 

ठाकरे संतापले; म्हणाले, शेतकऱ्याने न्याय मागितला तर राजकारण?

ठाकरे हंबरडा मोर्चात म्हणाले, "मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होतात. आता मी तुमची नियत काढतो. पण, मी राजकारण करत नाही. एका शेतकऱ्याने मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात की, बाबा राजकारण करू नको; मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मते पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं? हे कुठले सरकार आहे?", असा उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shelar slams Thackeray: Save tears, defeat awaits in corporations.

Web Summary : Ashish Shelar criticized Uddhav Thackeray's 'Hambarda Morcha', reminding him of unfulfilled promises to farmers and the plight of Mumbaikars during his tenure. He suggested Thackeray save his tears for upcoming corporation election defeats, highlighting the government's support during past crises.
टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण