शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
2
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
3
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
4
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
5
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
6
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
7
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
8
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
9
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
10
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
11
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
12
वरमाळा पडली अन् नवरदेवाने दिलेले दागिनेच खोटे निघाले; मग काय नवरीने...
13
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
14
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
15
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
16
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
17
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
18
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
19
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
20
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 12:53 IST

Sanjay Raut, Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार, संजय राऊतांचे संकेत.

दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यात तू तू-मै मै झाल्याची चर्चा असतानाच शनिवारी दुपारी तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बैठक पार पडली. यानंतर आज लगेचच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलविल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी विषय महत्वाचा आणि गंभीर असल्याचे सूतोवाच केले आहे. 

मविआचे जागावाटप आज जाहीर होण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. परंतू एकूणच प्रकरण जागावाटपावरूनच असल्याचे समजते आहे. ''काल साधारण दहा तास बैठक झाली. आज सकाळी माझी आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. पुढल्या वाटचाली संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरविणार आहोत'', असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.

आम्हाला असे वाटते की महाविकास आघाडीचा पाया जो रचला आहे तो टिकला पाहिजे आणि ती जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे महाराष्ट्रात संविधान बचावची मुव्हमेंट आहे ती यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो, असे राऊत म्हणाले. 

शिवसेनेने ज्या अर्थी मातोश्रीवर तातडीची बैठक घेत आहे, त्या अर्थी हा विषय महत्त्वाचा आणि गंभीर आहे, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना