शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मालाच आलेले नाही; ते वारसा चालवणारे नेते : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 11:06 AM

नवीन देण्याची मानसिकता नसलेलं हे सरकार असल्याचं त्यांनी आरोप केला.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकाराला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहे. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे परंपरागत वारसा यशस्वीपणे चालवू शकतात, मात्र ते मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मालाच आलेले नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

पाटील यावेळी म्हणाले की, ठाकरे सरकार आमच्या आंदोलनाला 100 दिवसातच घाबरले आणि दीड लाखाची कर्जमाफी 2 लाख करून दिली. त्यामुळे काही तरी नवीन देण्याची मानसिकता नसलेलं हे सरकार असल्याचं त्यांनी आरोप केला.

तर याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सभागृहात प्रमुखांनी प्रश्न-उत्तरला आणि लक्षवेधीला उपस्थित असणे गरजेचे असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सभागृहात धाडसाने बसायला हवे. मात्र असे होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जन्म मुख्यमंत्री होण्यासाठी झालाच नाही. तसेच नेते होण्यासाठी सुद्धा झालेला नाही, मात्र परंपरागत वारसा ते यशस्वीपणे चालवत असल्याचा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगवाला.

उद्धव ठाकरे यांना हेक्टर आणि एकरमधील फरक कळत नाही. त्यामुळे सरकारचे 100 दिवस गेले असून, पुढील 200 दिवस सुद्धा अशीच जातील. तर स्वार्थासाठी एकत्र आलेल्या माणसांचे स्वार्थ टक्कर देत नाहीत तोपर्यंत ते एकत्र असतात. तसेच स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांनी तत्वज्ञान सोडायचं ठरवलेलं असतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तत्वज्ञान सोडण्याची तयारी दर्शवली असून, हे सावरकरांच्या मुद्यावरून स्पष्ट झाले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी पाटील यांनी केला.