शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मालाच आलेले नाही; ते वारसा चालवणारे नेते : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 11:17 IST

नवीन देण्याची मानसिकता नसलेलं हे सरकार असल्याचं त्यांनी आरोप केला.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकाराला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहे. यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे परंपरागत वारसा यशस्वीपणे चालवू शकतात, मात्र ते मुख्यमंत्री होण्यासाठी जन्मालाच आलेले नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे. एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

पाटील यावेळी म्हणाले की, ठाकरे सरकार आमच्या आंदोलनाला 100 दिवसातच घाबरले आणि दीड लाखाची कर्जमाफी 2 लाख करून दिली. त्यामुळे काही तरी नवीन देण्याची मानसिकता नसलेलं हे सरकार असल्याचं त्यांनी आरोप केला.

तर याचवेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सभागृहात प्रमुखांनी प्रश्न-उत्तरला आणि लक्षवेधीला उपस्थित असणे गरजेचे असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सभागृहात धाडसाने बसायला हवे. मात्र असे होत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जन्म मुख्यमंत्री होण्यासाठी झालाच नाही. तसेच नेते होण्यासाठी सुद्धा झालेला नाही, मात्र परंपरागत वारसा ते यशस्वीपणे चालवत असल्याचा टोला पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगवाला.

उद्धव ठाकरे यांना हेक्टर आणि एकरमधील फरक कळत नाही. त्यामुळे सरकारचे 100 दिवस गेले असून, पुढील 200 दिवस सुद्धा अशीच जातील. तर स्वार्थासाठी एकत्र आलेल्या माणसांचे स्वार्थ टक्कर देत नाहीत तोपर्यंत ते एकत्र असतात. तसेच स्वार्थासाठी एकत्र आलेल्या लोकांनी तत्वज्ञान सोडायचं ठरवलेलं असतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तत्वज्ञान सोडण्याची तयारी दर्शवली असून, हे सावरकरांच्या मुद्यावरून स्पष्ट झाले असल्याचा आरोप सुद्धा यावेळी पाटील यांनी केला.