शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: February 27, 2015 23:17 IST

उद्योग बंदचा फटका : उद्योजकांच्या नाराजीत वाढ; तीव्र आंदोलनाचा इशारा

कुपवाड : महावितरणकडून करण्यात आलेल्या ३५ टक्के वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज (शुक्रवारी) औद्योगिक वसाहतीमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. इतर राज्यांच्या तुलनेत ही वाढ दुप्पट असल्याने उद्योजकांच्या नाराजीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळेच या औद्योगिक बंदला उद्योजकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधून सुमारे दोनशे कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. औद्योगिक घटकासाठी शासनाकडून यापूर्वी ७०६ कोटीचे अनुदान देण्यात येत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान दिले गेले. त्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या भाजप शासनाने हे अनुदान बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. त्यामुळे महावितरण कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी औद्योगिक घटकासाठी २१ टक्के दरवाढ केली. या दरवाढीमुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. या दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन झाल्यानंतर शासनाने तात्पुरते अनुदान देऊन आंदोलन शांत केले. परंतु, अचानक पुन्हा महावितरणकडून ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगास सादर करण्यात आला आहे. ही वाढही पुढील महिन्यापासून लागू होणार असल्यामुळे उद्योजकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. राज्यभर आज आंदोलने झाली.जिल्ह्यातही सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत, वसंतदादा औद्योगिक वसाहत, वाळवा चेंबर आॅफ कॉमर्स, संजय इंडस्ट्रीयल इस्टेट आदी औद्योगिक वसाहतींनी उद्योग बंद ठेवून शासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. उद्योग बंदला औद्योगिक वसाहतीमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे सांगली परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे दोनशे कोटीहून अधिक उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ शासनाने मागे न घेतल्यास संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)महाराष्ट्राची चुकीच्या दिशेने वाटचालवीज दर कमी झाल्याशिवाय ‘मेक इन महाराष्ट्र’चे स्वप्न साकार होणार नाही. उद्योग वाढीसाठी व इतर राज्यांशी स्पर्धा करण्यासाठी वीज दरही कमी असावे लागतात. अच्छे दिनची अपेक्षा बाळगलेल्या उद्योजकांना वाईट वागणूक मिळत आहे. मुख्यमंत्र्यांची वाटचाल महाराष्ट्र मोडण्याच्या दिशेने सुरू आहे. ही वाढ कमी न झाल्यास यापुढील कालावधित कामगारांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत, असे मत सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅलीचे माजी उपाध्यक्ष सतीश मालू यांनी व्यक्त केले.महावितरणने देशात सर्वाधिक दरवाढ केल्यामुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कुपवाड एमआयडीसीमधील ७५ टक्के उद्योग बंद होते. बंदमुळे शंभर कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. ही दरवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार आहोत.- शिवाजी पाटील, अध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, कुपवाडभ्रष्टाचार लपविण्यासाठी महावितरणने ही दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे इतर राज्यांच्या उत्पादनांशी उद्योजक स्पर्धा करू शकत नाहीत. यामुळे उद्योग बंद पडतील. महाराष्ट्र देशात अग्रेसर होणार नाही. म्हणून ही दरवाढ मागे घ्यावी.- डी. के. चौगुले, उपाध्यक्ष, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, एमआयडीसी, कुपवाड.