शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

गिर्यारोहकांनो, साहसाबरोबरच जीव तितकाच महत्त्वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:00 PM

शनिवारी अनुभवी, मातब्बर गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या कोकणकड्यावरूनपडून झालेल्या मृत्यूने गिर्यारोहकांवर शोककळा

ठळक मुद्देगिर्यारोहकांचे मत : अनुभव, कौशल्याशिवाय मोहीम नकोच; सावधगिरी बाळगणे गरजेचेदाखविण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी गिर्यारोहण

पुणे : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील डोंगरदऱ्या गिर्यारोहकांना नेहमीच आव्हान देत आल्या आहेत. अनेकांनी अवघड, बिकट अशा किल्ले, डोंगर व सुळक्यांवर यशस्वी चढाईदेखील आहे. मात्र यात पुरेशी काळजी घेतली न गेल्याने त्यांना जीवदेखील गमवावा लागला आहे. यंदा राजगड येथे एका गिर्यारोहकाचा झालेला मृत्यू व शनिवारी अनुभवी, मातब्बर गिर्यारोहक अरुण सावंत यांच्या मृत्यूने गिर्यारोहकांवर शोककळा पसरली आहे. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाला आपल्या कवेत घेणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत गिर्यारोहकांच्या मृत्यूने नवोदित, शिकाऊ व उत्साही गिर्यारोहकांपुढे काही प्रश्न उपस्थित केले आहेत.ज्येष्ठ गिर्यारोहक ॠषी यादव म्हणाले, की ड्युक्स नोजची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक म्हणून अरुणचे नाव घ्यावे लागेल. महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी व क्रमांक एकचा गिर्यारोहक अशी त्याची ओळख होती. त्याचा अनुभव व कौशल्याबद्दल शंका येण्याचे कारण नाही. त्याने आजवर अनेक मोहिमा यशस्वी करून मार्गदर्शन केले आहे. त्याचा मृत्यू नेमका निसर्गाच्या चुकीने की त्याच्या स्वत:च्या चुकीने झाला याबद्दल सांगता येणार नाही. याउलट परिस्थिती हिमालयात पाहायला मिळते. तिथे निसर्गाची कृपा असल्यास मोहिमा यशस्वी होताना दिसतात. नवोदित, शिकाऊ व हौशी गिर्यारोहकांनी या घटनेवरून शिकण्याची गरज आहे. अरुण सारखा अनुभवी व मातब्बर गिर्यारोहकाला देखील मृत्युला सामोरे जावे लागले. त्यामुळे सातत्याने सराव, अनुभव व तांत्रिक कौशल्य संपादन केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये. ही गोष्ट तरुण गिर्यारोहकांनी लक्षात घेण्याची गरज आहे...............दाखविण्यासाठी नव्हे तर स्वत:साठी गिर्यारोहणकुठल्याही किल्ल्यावर अथवा पर्वतावर गेल्यानंतर तिथे गिर्यारोहणाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढण्यावर अधिक भर देताना दिसतात. निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सोशल मीडियावर फोटो टाकण्याची त्यांची हौस मृत्यूला कारणीभूत होत आहे. अनेक दा तरुण गिर्यारोहक किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील बुरुजावरून खाली उतरतात. बुरुज जीर्ण झाल्याने त्या जागेवरुन गिर्यारोहण करणे धोकादायक आहे. ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही. अतिउत्साहीपणाच्या भरात जिवाची किंमत त्यांना मोजावी लागते. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. विशेषत: दरीच्या ठिकाणी सेल्फी घेण्याची हौस तरुणांच्या अंगलट आली आहे.....................अरुणचे जाणे आम्हा सर्व गिर्यारोहकांसाठी मोठी धक्कादायक गोष्ट आहे. तो एक अनुभवी गिर्यारोहक होता. त्याच्यासारख्या अनुभवी गिर्यारोहकाकडून नेमकी काय चूक झाली यावर लगेच काही सांगता येणार नाही. त्याने त्याच्या गिर्यारोहणाच्या काळात अनेक नवीन वाटा शोधल्या. पुढे त्या सर्वांना माहिती झाल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी राजगड येथे देखील एका गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आपण ज्या ठिकाणी गिर्यारोहणाकरिता जात आहोत, त्याची पुरेशी माहिती घेणे, आवश्यक ती साधने जवळ बाळगणे महत्त्वाचे ठरते. नवीन लोकांनी गिर्यारोहणाचे धाडस जरूर दाखवावे; मात्र त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. उत्साहाच्या भरात केलेली एखादी चूक जिवावर बेतते. तरुणांना या क्षेत्राची आवड आहे. त्यात त्यांना अधिक नव्याने काही शोधण्याची इच्छा तसेच गिर्यारोहणाची आवड असणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी मोहिमेसाठी आवश्यक तयारी, अभ्यास व मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांना सांगावेसे वाटते.- उमेश झिरपे, गिर्यारोहक व गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक.................

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगFortगडDeathमृत्यू