शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: July 10, 2017 03:10 IST

वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल ३५३० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिल्याची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पांडवकडा धबधबा बंद केला आहे. खारघरच्या टेकड्यांवर जाण्यासही परवानगी दिली जात नाही. देहरंग धरणासह इतर ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यासही मनाई केली जात आहे. वर्षासहलीसाठी असलेल्या बहुतांश ठिकाणी प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने पर्यटकांकडून कर्नाळा अभयारण्य परिसराला भेट देण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. या परिसरामध्ये छोटे धबधबे, विविध प्रकारचे पक्षी, कर्नाळा किल्ला पाहण्यास मिळत असल्याने शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. २ जुलैला रविवारी १७८२ पर्यटकांनी या परिसराला भेट दिली होती. ८ जुलैला शनिवारी १२५० व रविवारी सायंकाळपर्यंत २२८० पर्यटकांनी भेट दिली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा कमी झाली असून पर्यटकांना रोडवर वाहने लावावी लागली होती. पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, उत्साहामध्ये तलावामध्ये उतरू नये, यासाठी वनविभाग व्यवस्थापनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या; परंतु यानंतरही सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक जण तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पर्यटकांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे; परंतु पर्यटकांनीही सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.>अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य सहकार्य करावे व सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा. - अन्वर शेख, वन परिमंडळ अधिकारी>रविवारी तब्बल २२८० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ही विक्रमी संख्या आहे. वनविभागाचे कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. - पी. पी. चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी