शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: July 10, 2017 03:10 IST

वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल ३५३० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिल्याची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पांडवकडा धबधबा बंद केला आहे. खारघरच्या टेकड्यांवर जाण्यासही परवानगी दिली जात नाही. देहरंग धरणासह इतर ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यासही मनाई केली जात आहे. वर्षासहलीसाठी असलेल्या बहुतांश ठिकाणी प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने पर्यटकांकडून कर्नाळा अभयारण्य परिसराला भेट देण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. या परिसरामध्ये छोटे धबधबे, विविध प्रकारचे पक्षी, कर्नाळा किल्ला पाहण्यास मिळत असल्याने शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. २ जुलैला रविवारी १७८२ पर्यटकांनी या परिसराला भेट दिली होती. ८ जुलैला शनिवारी १२५० व रविवारी सायंकाळपर्यंत २२८० पर्यटकांनी भेट दिली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा कमी झाली असून पर्यटकांना रोडवर वाहने लावावी लागली होती. पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, उत्साहामध्ये तलावामध्ये उतरू नये, यासाठी वनविभाग व्यवस्थापनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या; परंतु यानंतरही सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक जण तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पर्यटकांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे; परंतु पर्यटकांनीही सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.>अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य सहकार्य करावे व सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा. - अन्वर शेख, वन परिमंडळ अधिकारी>रविवारी तब्बल २२८० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ही विक्रमी संख्या आहे. वनविभागाचे कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. - पी. पी. चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी