शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: July 10, 2017 03:10 IST

वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्षासहलीसाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांकडून कर्नाळा अभय अरण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल ३५३० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिल्याची नोंद झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी पांडवकडा धबधबा बंद केला आहे. खारघरच्या टेकड्यांवर जाण्यासही परवानगी दिली जात नाही. देहरंग धरणासह इतर ठिकाणी असलेल्या धबधब्यांवर जाण्यासही मनाई केली जात आहे. वर्षासहलीसाठी असलेल्या बहुतांश ठिकाणी प्राथमिक सुविधाही मिळत नसल्याने पर्यटकांकडून कर्नाळा अभयारण्य परिसराला भेट देण्यास प्रथम पसंती दिली जात आहे. या परिसरामध्ये छोटे धबधबे, विविध प्रकारचे पक्षी, कर्नाळा किल्ला पाहण्यास मिळत असल्याने शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. २ जुलैला रविवारी १७८२ पर्यटकांनी या परिसराला भेट दिली होती. ८ जुलैला शनिवारी १२५० व रविवारी सायंकाळपर्यंत २२८० पर्यटकांनी भेट दिली होती. मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे वाहनतळाची जागा कमी झाली असून पर्यटकांना रोडवर वाहने लावावी लागली होती. पर्यटकांना योग्य माहिती मिळावी, उत्साहामध्ये तलावामध्ये उतरू नये, यासाठी वनविभाग व्यवस्थापनाने विशेष उपाययोजना केल्या होत्या; परंतु यानंतरही सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक जण तलावामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पर्यटकांना नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अभयारण्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे; परंतु पर्यटकांनीही सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.>अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पर्यटकांनीही दिलेल्या सूचनांचे पालन करून योग्य सहकार्य करावे व सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा. - अन्वर शेख, वन परिमंडळ अधिकारी>रविवारी तब्बल २२८० पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून ही विक्रमी संख्या आहे. वनविभागाचे कर्मचारी व संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. - पी. पी. चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी