शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मुंगळे आहेत, तोवर हे सरकार टिकेल!

By admin | Updated: October 15, 2015 03:10 IST

गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही

मुंबई : गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला. त्याचवेळी या सरकारमध्ये राष्ट्रवादी कदापि सहभागी होणार नाही, हेही स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि फडणवीस सरकारची निष्क्रियता यावर माहिती देण्यासाठी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दुष्काळी भागातील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका करून ते म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेल्या योजना केवळ कागदावरच आहेत. दुष्काळी भागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क राज्य सरकारने भरलेले नाही. ३४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पण अजून त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. दुष्काळी भागातील लोकांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत काढलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे त्यांनी सांगितले.इंदू मिलच्या कार्यक्रमात सरकारने विरोधकांना बोलावले नाही. वास्तविक विधिमंडळाच्या सदस्यांना सरकारी कार्यक्रमांना बोलावण्याचा प्रघात आहे. मात्र या सरकारला ते महत्त्वाचे वाटले नसावे, असा चिमटाही पवारांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)>>भाजपाने सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ज्यांनी सरकार स्थापन केले तेच त्यामधून कसे काय बाहेर पडतील? जे पाठीमागून गेले, त्यांना कारभार पटत नसेल, तर त्यांनी बाहेर पडावे. पण तसे होईल, असे वाटत नाही. स्वाभिमानी लोकांकडून सत्तेसाठी सोशिकपणा दाखवला जातो आहे. त्यामुळे तूर्त तरी कोणी सत्ता सोडेल, असे वाटत नाही, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच, तर आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.