शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:39 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी बारामती म्हटल्यावर कुणाचे नाव घेतात? बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा, अशी साद शरद पवार यांनी बारामतीकरांना घातली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. 

देशाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी बारामती म्हटल्यावर कुणाचे नाव घेतात? असा प्रश्न शरद पवारानी विचारताच बारामतीकरांनी 'शरद पवार, शरद पवार' असा जल्लोष सुरू झाला. बारामतीच्या विकासाची परंपरा आता युगेंद्र पवार पुढे नेतील, त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा. गेल्या निवडणुकीला बारामतीकरांनी मोठे मताधिक्य दिले. सुप्रिया सुळेंना साथ दिली. आता विधानसभेची निवडणूक होत असून त्यामध्येही काळजी घेण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. 

लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज

आधी इथल्या वडिलधाऱ्यांनी मला आमदार बनवले , मी काम केले . त्यानंतर अजित पवारांना निवडून दिले. अजित पवारांना संधी दिली. युगेंद्र उच्च विद्याभुषित आहे, परदेशात शिक्षण घेतले आहे. त्यांच्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे‌. ठिकठिकाणी फिरुन माहिती घेत आहेत.  ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आता पुढच्या पिढीची गरज आहे. बारामतीमध्ये ते समाजकार्य करतात. बारामतीकरांचा विकास करण्याची क्षमता युगेंद्र यांच्यात आहे. त्यामुळे त्यांना संधी द्या. युगेंद्रला निवडून द्या, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीकरांना केले. 

दरम्यान, महाराष्ट्र काय चीज आहे हे देशाला लोकसभा निवडणूकीने दाखवून दिले. बहीण लाडकी आहे, त्यांचा सन्मान जरुर करा. पण एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचे दुसरीकडे यांच्या कालखंडात महिलांवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण जास्त आहे. महिला आणि मुली बेपत्ता आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतीमालाची किंमत मिळत नाही, कर्जबाजारी पणा वाढला. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने उद्योगपतींचे अठरा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे दोन हजार रुपये ते माफ करत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीSharad Pawarशरद पवारyugendra pawarयुगेंद्र पवारbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेस