शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

मासे पक़डण्याच्या जाळ्य़ात आणि बोटीच्या पंख्यात अडकून दुर्मीळ कासवांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 16:55 IST

कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या समुद्र किनाऱ्यावर होतो, त्याचठिकाणी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात.

जयंत धुळप, अलिबाग: मोठय़ा मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ्य़ात अडकून आणि बोटींच्या पंख्यात(ईम्पेलर) अडकल्यामुळे जखमी होऊन मृत पावणाऱ्या दुर्मिळ आणि केंद्रीय पर्यावरण विभागाकडून अतिसंरक्षित प्रजाती म्हणून घोषित ‘ऑलिव्ह रिडले’ या सागरी कासवांचे मृत्यू ही सागरी कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय कार्यरत पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांमध्ये मोठय़ा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या 20 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पाच तर अलिबागजवळच्या वरसोली सागर किनारी शनिवारी एक पूर्ण वाढ झालेले मृत ‘ऑलिव्ह रिडले’ सागरी कासव आढळले होते. तर गतवर्षी दिवेआगर सागर किनाऱ्यावरही दोन मृत कासवे आढळली होती.कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या समुद्र किनाऱ्यावर होतो, त्याचठिकाणी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरीता येतात. हे या ऑलिव्ह रिडले या जातीच्या सागरी कासवांचे एक वैशिष्ठय़ असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक डॉ. वैभव देशमुख यांनी दिली. ऑलिव्ह रिडले या जातीच्या सागरी कासवांचे प्रमाण सागरी कासव संरक्षण व संवर्धन मोहीमेतून गेल्या 15 ते 16 वर्षात वृद्धिंगत होत असतानाच त्याच कासवांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी मच्छिमारीला जाणाऱ्या बांधवांमध्ये जागृती करण्याची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. मुळात सागरी कासवे श्वसन प्रक्रियेकरीता समुद्राच्या वरच्या भागात येतात आणि हवेतील ऑक्सिजन घेत असतात. एकदा पाण्याच्यावर येऊन ऑक्सिजन घेतल्यावर पाण्याखाली ते 10 ते 15 मिनिटे राहू शकतात. या दरम्यान ही कासवे अनेकदा मासे पकडण्याच्या जाळ्य़ात अडकून आणि बोटींच्या पंख्याने अनेकदा जखमी होतात. आणि समुद्रात मृत झाल्यावर जवळच्या सागरी किनाऱ्यावर येऊन धडकतात. वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने सागरातील अपघात या कारणांमुळे सागरी कासवांचे जगण्याचे प्रमाण केवळ 10 टक्के असल्याचे डॉ.देशमुख यांनी  सांगितले.

दिवेआगरमध्ये गतवर्षी 367 तर यंदा आतापर्यंत 561 कासवाच्या पिल्लांचा जन्मनामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे राऊंड ऑफिसर हरिश्चंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी 1क् ते 12 वनमजूर आणि निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी 2017 मधीस सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात 367 सागरी कासवाची अंडी दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात शोधून काढण्यात या चमूला यश आले त्यांचे संवर्धन करुन नवजात कासवांची पिल्ले पून्हा समुद्रात सोडण्यात आली. यंदा दिवेआगर सागर किनारी 10 घरटय़ांचे संरक्षण करण्यात आले,त्या पैकी पाच घरटय़ांतील 561 नवजात कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले असल्याचे नाईक यांनी सांगीतले.

भारतात सागरी कासवांची एकूण 5 कुळे व 31 जाती भारतात सागरी कासवांची एकूण 5 कुळे व 31 जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये या सागरी कासवाचा समावेश होतो. भारतामध्ये त्यातील ‘लेदरबॅक’ ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकिबल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो.  

टॅग्स :wildlifeवन्यजीवkonkanकोकण