शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:09 IST

राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काल घडली. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले की, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे नीचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० टक्के वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ टक्के वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची, असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरू केला असून ५० हजार कोटी रुपयांच्या दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडे तिजोरी रिकामी असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणे गरजेचे असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी महायुती सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण