शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:09 IST

राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना काल घडली. या घटनेनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असून विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच, राज्यावर कर्जाचा बोजाही वाढत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले की, टेंडरबाज, दलालीखोर सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही दलाली खाण्याचे कृत्य म्हणजे नीचपणाचा कळस आहे. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकात १० टक्के वाढ आणि नंतर वाढीव दराने टेंडर भरून २५ टक्के वाढ करायची नंतर कंत्राटदाराकडून दलाली खायची, असा नवा गोरखधंदा या सरकारने सुरू केला असून ५० हजार कोटी रुपयांच्या दलालीची प्रकरणे मी स्वतः बाहेर काढली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकीकडे कामांची बिले निघत नाहीत म्हणून विकासकामे थांबली आहेत, तर दुसरीकडे तिजोरी रिकामी असल्याने अनेक योजनांना तसेच भरती प्रक्रियांनाही स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र दलालीच्या दलदलीत अडकला असून राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. या दलालीच्या दलदलीला घाबरून गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

महाराष्ट्राची अधोगतीकडे होत असलेली वाटचाल रोखणे गरजेचे असून त्यासाठी राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी महायुती सरकारने त्वरित दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा करायला हवी, अन्यथा दिवाळखोरीच्या गर्तेत अडकत चाललेला महाराष्ट्र बाहेर काढणे खूप कठीण होऊन बसेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण