शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अजितदादा नसते तर हे सरकार टिकलं नसतं; राष्ट्रवादी आमदाराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:14 IST

जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं नाराज आमदाराने सांगितले.

पुणे - राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव करून भाजपानं बाजी मारली आहे. या निवडणुकीत मविआच्या अपक्ष आणि घटक पक्षांशी काही मते फुटली आणि त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत असलेल्या नाराज आमदारांची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. 

यात राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. दिलीप मोहिते म्हणाले की, गेल्या दोन अडीच वर्षापासून आमचा कुणी विचार केला नाही. मंत्रालयात आल्यावर अजितदादांना भेटायचो. सगळ्या समस्या त्यांना सांगायच्या. सगळ्या पक्षातील आमदारांना मदत करण्याचं काम ते करतात. अजित पवार नसते तर हे सरकार टिकलं नसतं. आमच्यासारख्या आमदारांचा ते विचार करतात. तर बाकीच्यांनी का करू नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

इतकेच नाही तर जर माझ्यावर अन्याय होत असेल तर त्यासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. गेली वर्षभर आमच्या अनेक फाईल्स मंत्रालयात पडून आहेत. त्या माझ्या वैयक्तिक नाही. पंचायत समिती इमारत, प्रशासन इमारत, पोलीस स्टेशनची इमारत तालुक्याकरता आहे. मी त्याला निधी द्या म्हणतोय त्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. असं राजकारण करू नये. आमचं राजकारण अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वत: मुख्यमंत्र्यांना फोन केला परंतु तरीही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल माझी नाराजी आहे असं स्पष्टपणे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले. 

अपक्ष आमदारांची मते मिळाली नाहीत - शिवसेना राज्यसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली. संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, भाजपाने जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले. तसेच बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRajya Sabhaराज्यसभा